विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला?

भाजप 12, शिवसेना 3, राष्ट्रवादी 2

मुंबई/20 मे– राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीची घोषणा केली. 18 जून 2026 रोजी मतदान होणार आहे. विधानपरिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे.
महायुतीच्या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे. भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस साठी 2 जागांबाबत चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली. येत्या आठवड्याभरात या जगांबाबत निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या फॉर्म्युल्यात आणखी काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये विधानपरिषदेच्या 16 आणि एक पोट निवडणुकीची जागा असणार आहे. या निवडणुकीसंदर्भात काल समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होते. ही बैठक मंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानी झाली होती. या बैठकीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते उपस्थित होते. या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत फॉर्मुला बनवण्यात आला. यामध्ये 12 जागा भाजप, 3 जागा शिवसेना आणि 2 जागा राष्ट्रवादीला देण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. या चर्चेवर कुठलाही पद्धतीचा शिक्कामोर्तब झाला नसून आगामी होणार्‍या समन्वय बैठकीमध्ये देखील याच फॉर्मुलावर सुरुवातीला चर्चा केली जाणार आहे. मात्र त्यात काही बदल होण्याचे संकेत देण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जागा वाटपावर होणार अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगितले जात आहे.विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला समोर आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील संख्याबळावर प्राथमिक चर्चेस सुरुवात झाली आहे. सदस्य संख्या जास्त असलेल्या पक्षाकडून संबंधित विधानपरिषद जागेवर दावा करण्यात आला आहे. या सूत्रानुसार भाजपच्या वाट्याला 12, तर शिवसेनेच्या वाट्याला 3 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 2 जागा असणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत भाजप 12, शिवसेना 3, तर राष्ट्रवादी 2 जागांवर चर्चा सुरु आहे. काही जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्याभरात जागा वाटपावर महायुतीत एकमत होण्याची शक्यता आहे.
प्राथमिक चर्चेनुसार जागा वाटपाचा फॉर्म्युला -भाजप 12, शिवसेना 3, राष्ट्रवादी 2
कुठल्या जागेवर कोणत्या पक्षाचा दावा…?
राष्ट्रवादी काँग्रेस- रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग, हिंगोली – परभणी
शिवसेना- ठाणे, नाशिक, यवतमाळ,
भाजप – नागपूर, वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर – जालना, सातारा – सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा – गोंदिया, अमरावती, लातूर – धाराशीव – बीड, सोलापूर

संबंधित बातम्या

Back to top button