प्रहारचे संपर्क प्रमुख अजय चौधरी यांचा विष घेवून आत्महत्येचा प्रयत्न
महात्मा फुले चौकात बाईक रॅली दरम्यानची घटना

*बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने संतप्त
वरुड। 13 जुन– शेतकर्यांना कर्जमाफी सह इतर मागण्यां साठी मागण्याकरीता माजी राज्यमंत्री बच्च्ाू कडू यांचे आमरण उपोषण सुरु असतांनाच आज 13 जुनला प्रहारचे तालुका संपर्क प्रमुख अजय चौधरी यांनी आज सकाळी भर चौकात पोलांसाच्या समक्ष विष प्राशन केले. या घटनेने एकच खळबळ उडाली. सद्य: अजय चौधरी यांचेवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रहार संस्थापक तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे गुरुकुंज मोझरी येथे शेतकरी, शेतमजुर, दिव्यांग, वाहन चालक समवेत एकुण 17 मागण्यांना घेऊन आमरण उपोषण सुरु आहे. मात्र शासनाने या आंदोलनाची अजूनपर्यंत या आंदोलनाची दाखल घेतली नाही. स्थानिक प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुकुंज मोझरी येथे सुरु असलेल्या या आंदोलनात सहभाग घेण्यासाठी आज वरुड येथुन मोझरी पर्यंत बाईक रैलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बाईक रैलीला स्थानिक महात्मा फुले चौकातुन प्रारंभ करण्यात येणार होता. या रॅलीत सहभागी होण्यासाठी अनेक शेतकरीशेतम जुर, दिव्यांग व कार्यकर्ते हे आज सकाळी 10 च्या सुमारास महात्मा फुले चौकात उपस्थित झाले असताना अजय चौधरी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करणे सुरु केले. त्यावेळी बोलतांना सरकार आता मरणाचीच वाट पाहत आहे का? असा सवाल करुन अजय चौधरी यांनी सोबत आणलेले विष प्राशन केले त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यावेळी सुरक्षेच्या द़ृष्टीने उपस्थित असलेल्या पोलिसांनी अजय चौधरी यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करुन चौधरी यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. अजय चौधरी यांनी दोन दिवसांअगोदर स्वत: आपल्या लग्नाची अंगठी गहान ठेवून माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. काल 12 जुनला तालुक्यातील झटामझिरी येथे सुद्धा शेतकरी, प्रहारचे कार्यकर्त्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रशासनाच्या मध्यस्थिने हेआंदोलन मागे घेण्यात आले होते.