शेतकर्‍यांना 30 जूनच्या आधी कर्जमाफी मिळणार

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

मुंबई/20एप्रिल-आगामी खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट असून यंदा राज्यात दीर्घकालीन सरासरीच्या 92 टक्केच पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर यंदा 145.20 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात घोषित केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ 30 जूनच्या आत राबवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पुण्यातील शिवाजीनगर भागात नव्याने बांधण्यात आलेल्या ‘सारथी’च्या सभागृहात खरीप हंगाम 2026-27 च्या पूर्वतयारीसाठी राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत भरणे बोलत होते. यावेळी कृषी आयुक्त सूरज मांढरे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यंदा खरिपासाठी 20.17 लाख क्विंटल बियाण्यांची गरज असून, 28.05 लाख क्विंटल साठा उपलब्ध आहे. खतांच्या बाबतीतही राज्य सुरक्षित असून, 48.80 लाख मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. सद्यस्थितीत 25.17 लाख मेट्रिक टन खत उपलब्ध असून, टंचाई भासणार नाही याची खबरदारी घेतल्याचे भरणे यांनी स्पष्ट केला.

संबंधित बातम्या

Back to top button