आई रुख्मीणी मातेचा पालखी सोहळ्याचे रविराज देशमुख यांचे हस्ते स्वागत करून पुढील प्रवासासाठी रवाना

कुर्हा /2 जून: आषाढी एकादशी ला होणार्या आषाढी उत्सवासाठी मानाचां श्री आई रुक्मीणी मातेचा पालखी सोहळ्याचे पंढरपूर साठी दिनांक 31 मे शनिवार रोजीक्षेत्र कौंडण्यपूर येथून प्रस्थान
झाले. महाराष्ट्रातील प्रथम असलेला हा पालखी सोहळा 1594 साली संत सदगुरू सदाराम महाराजांनी सुरू केला.पालखी सोहळ्याचे हे 431 वे वर्ष आहे.सतत 33 दिवस पायदळ चालणारी ही महाराष्ट्रातील सर्वात अंतर चालणारी पालखी आहे.दिनांक 2 जुलै 25 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचते.या पालखी सोहळ्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण रविराज देशमुख यांचे हस्ते पुजन करून पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय पुंडेकर, संतोष मठिया, गणेश बांबल, आशिष डुबे, गजानन बांबल, अंकुश देऊळकर, विनायक कडू, दिलीप मेहकर, दिनेश ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, नारायण कुरवाडे, सुभाष खंडारे, नारायण ठाकरे, निखिल ठाकरे, प्रशांत कडू, उमेश श्रीखंडे, श्याम नरखेडकर, मोरेश्वरराव मुळे, अमोल आसोले, रामकृष्ण थोटे, संतोष ताजने, पवन नागमोते, चंदू ठाकरे, अतुल ठाकरे, सचिन महलले, आशीष पाटील, स्वप्नील खेडकर, अंकुश पुंडेकर, हितेश गोरडे, मृणाल खंडारे, आकाश ठाकरे, वैभव ठाकरे, गजानन ठाकरे, आश्विन ठाकरे, अर्पित डुबे, प्रफुल ठाकरे, लखन वैरागडे, प्रफुल देऊळकर, अमोल बोरसरे, मोहित मानमोडे, प्रयास भाकरे, हिरेन क्षीरसागर, गणेश वैरागडे, अभय मेहकर, गौरव मेहकर, सार्थक ठाकरे,अमोल आसोले,सतिश चाफले यांच्यासह पंचक्रोशीतील गावकरी, युवक व अंबा रुख्मिणी महोत्सव समितीचे सर्व सभासद तसेच रविरज देशमुख मित्रपरिवारातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.