छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एक ऐतिहासिक घटना

डॉ. श्रीकांत पाटील यांचे प्रतिपादन

– 6 जूनला विद्यापीठात भव्य कार्यक्रम
अमरावती/2 जून– छत्रपती शिवरायांनी 6 जून 1674 या दिवशी रायगडावर राज्याभिषेक करून मध्ययुगीन काळातील जुलमी राज्यव्यवस्थेच्या नावावर टिच्चून स्वाभिमानी राज्याची निर्मिती केली. या पर्वावर विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत असलेल्या एम.ए.छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन विभागाच्यावतीने भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. सन 1645 ते 1680 या काळात विजापूरची आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज, राजापूरकर इंग्रज व बलाढए अशा मोगल सत्तेला वारंवार हादरे दिले. विजापूरची आदिलशाही तर या हादरामुळे शेवटपर्यंत बाहेरच येऊ शकली नाही. या सर्व जुलमी सत्ताधायांविरुद्ध लढतांना छत्रपती शिवरायांनी शत्रूंसाठी अनपेक्षित डावपेच वापरून लढायचा मार्ग व परिणामही बदलवून टाकला. या महत्त्वपूर्ण कार्याच्या प्रारंभी शिवाजी राजे हे एका छोट्या जहागीरीचे स्वामी होते. मात्र त्यांच्यासोबत बारा मावळ प्रांतातील रयत व शेतकरी हे एकदिलाने उभे झाले कारण हे राज्य रयतेचे आहे हा भाव शिवाजी राजे त्यांच्या मनात रुजवू शकले कारण स्वतः राजेच कल्याणकारी उद्दिष्टांनी झटत होते. स्वतःच्या जीवनातील अंतर्गत व बाह्य शत्रूविरोधात लढूनही राजे हे यशस्वी राज्यकर्ते झाले.
राज्याभिषेकाची गरज
शिवाजी राजांसारखे अनेक जमीनदार त्यावेळी होते. परंपरागत हा वर्ग यवनी सत्ताधायांची चाकरी करीत होता. त्या पाश्र्वभूमीवर छत्रपतींना स्वतःला सार्वभौम राजा बनविणे व अशा लोकांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक झाले होते. मध्ययुगीन काळात राजे हे पद निर्णायक होते व राज्याभिषेकाशिवाय रयतेलाही त्या राज्याबद्दल शास्वती वाटणार नाही हे राजे जाणून होते. तत्कालीन पोर्तुगीज, डच, इंग्रज व फ्रेंच यांच्यासोबतच तद्वतच इतर एतदेशीय सत्तांसोबतही पत्रव्यवहार करणे सार्वभौम राजालाच शक्य होते. इतिहासात डोकावल्यास, शिवरायांचे अनेक नातेवाईकही राजांना आपल्या सारखाच यवनी सत्तांचा सेवक मानायचे. राज्याचा विस्तार व्हावा, रयतेवर कायद्यांचे राज्य यावे व त्याला वैधानिक स्वरूप प्राप्त होण्याकरिता राज्याभिषेकाची नितांत गरज होती. वैदिक धर्माचे ज्ञान असणाया प्रसिद्ध गागा भट्टांना शिवरायांनी राज्याभिषेकासाठी पाचारण केले व 6 जून 1674 या दिवशी रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक करून राजा व राज्य हा दर्जा प्राप्त करून दिला.
शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक नेमका 6 जूनलाच का केला याचे विश्लेषण करतांना काही तज्ज्ञ म्हणतात की, त्याकाळी 05 जून 1659 या दिवशी औरंगजेबाने स्वतःला राज्याभिषेक केला होता व 7 जून पासून पावसाला सुरुवात होती. त्यामुळे आपला राज्याभिषेक व हे रयतेचे व शेतकयांचे राज्य सर्वांच्या लक्षात राहावे म्हणून राजांनी हा दिवस निवडला. कल्याणकारी राज्य कसे असावे याचा आदर्शच निर्माण करणारी घटना होती हे ऐतिहासिक वास्तव होय.
एम. ए. छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन अभ्यासक्रम
विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत इ.स. 2021 पासून ‘एम. ए. छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन’ हा अभिनव अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून शिवपूर्वकाळापासून अर्थात मध्ययुगीन काळातील भारतातील व दक्षिणेतील राजवटी, त्या काळातील सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक परिस्थिती व शिवकाळातील देदीप्यमान इतिहास व त्यांचे सद्यस्थितीतील राष्ट्रावरील परिणाम हे अभ्यासण्या सारखे आहे. सदर अभ्यासक्रमातून अपरिचित इतिहासावर तज्ञ प्राध्यापक मंडळीकडून प्रकाश टाकण्यात येतो. या अभ्यासक्रमाला अभ्यासक, संशोधक, विद्याथ्र्यांसोबतच अनेक प्रशासकीय अधिकारी देखील शिवाजी महाराजांचे कुशल नेतृत्व व कल्याणकारी विचारधारा शिकून राष्ट्र बांधणीत योगदान देत आहेत. या अभ्यासक्रमातून इतिहास संशोधक, गडकिल्ल्यांचे जाणकार, पर्यटन क्षेत्रातील मोठ्या संधी, चित्रपट कथा व लेखन इत्यादी अनेक संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. या अभ्यासक्रमासाठी डॉ. वैभव मस्के (9422157745) डॉ.भैयासाहेब चिखले (9075966815) प्रा. राम ओलीवकर (9552023723) प्रा. मनोज वाहाणे (8806379358) यांच्याशी अभ्यासकांना संपर्क साधता येईल.

संबंधित बातम्या

Back to top button