वाढदिवसानिमित्त बहारदार कविसंमेलन संपन्न
निराधारांना आधार देणार्या ज्योती राठोड यांच्या

अमरावती /5 जून: अमरावती महानगरपालिका अंतर्गत पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेयर सोसायटी अमरावती द्वारा संचालित आधार शहरी बेघर लोकांसाठी निवारा केंद्र बडनेराच्या व्यवस्थापिका तथा भारताच्या महामहीम राष्ट्रपति यांच्या कडून सन्मानप्राप्त कु. ज्योती राठोड मॅडम यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दि. 3 जून रोजी दुपारी 4 वाजता साप्ताहिक वज्जीसंदेशचे उपसंपादक तथा सामाजिक कार्यकर्ते आर. एस. तायडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कविसंमेलनात ज्येष्ठ कवयित्री मायाताई वासनिक, गणेश थोरात, दिगंबर झाडे, नंदकुमार चक्रे, संतोष शर्मा, देवीलाल रौराळे , विलास थोरात यांच्या बहारदार कवितांचे सादरीकरण झाले.
याप्रसंगी आर. एस. तायडे यांनी सांगितले की, ज्यांना आपल्या कुटूंबियांनी ऐन वृद्धावस्थेत आसरा देण्याचे नाकारत त्यांना निराधार व बेसहारा केले अशा निराधारांना आधार देणार्या ज्योती राठोड मॅडम यांनी आतापर्यंत 8 हजार निराधारांना मायेचा आधार दिला असून,72 लोकांचा स्मशानात जाऊन स्वतः सरण रचून त्यांना अग्नी दिला आहे. 480 विधवा महिलांना स्वतः च्या पायावर उभे केले आहे., 7 विधवा महिलांचे लग्न लावून दिले आहे त्याचबरोबर बेघर लोकांना स्वतः च्या पायावर उभे करून आत्मसन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी त्यांना छोटे छोटे उद्योग उभे करून देण्याचा सम्यक संकल्प केला असल्याबद्दल त्यांनी ज्योती राठोड मॅडम यांच्या उल्लेखनीय व समाजोपयोगी कार्याचा गौरव करून वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा दिल्यात व आपली अध्यक्षीय कविता ”जगणे असे जीवनभर,सुख ना मिळे घडीभर, गर्दीत माणसांच्या, मरणे असे निरंतर ”ही गझलसदृश्य कविता सादर केली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला वंदन करून हारार्पण करण्यात आले.त्यानंतर साप्ताहिक वज्जी संदेशचे कार्यकारी संपादक धर्मशिल गेडाम, मुख्य संपादक मायाताई वासनिक गेडाम व वज्जी संदेश परीवारा तर्फे ज्योती राठोड मॅडम यांचा शाल व पुष्प देऊन तसेच वाढदिवसाचा केक कापून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आधार केंद्राचे संचालक राजीव बसवनाथे यांनी तर सूत्रसंचालन आधार केंद्राचे काळजीवाहक विलास थोरात यांनी केले,तर आभार कु .ज्योती राठोड मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केअर टेकर रोहित घोंगडे, सदानंद ठाकरे यांसह बेघर निवारा वासियांनी अथक परिश्रम घेतले.