ताजनगरात पाण्याची घुसखोरी-भीतीचे वातावरण

चांदुर बाजार तालुक्यात अतिवृष्टी

चांदूरबाजार : शहरातील ताजनगर भागात सोमवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. नानोरी परिसरातील शेतांमधून आलेले पाणी आणि निचर्याचे मार्ग खुंटल्याने वस्ती जलमग्न झाली. इंदिरा गांधी उर्दू प्राथमिक शाळेची भिंत व शासकीय आयटीआय कॉलेजच्या बांधकामामुळे जुन्या नाल्याचा मार्ग बंद झाल्याने फक्त तीन फूटाची नाली उरली. त्यातून पाणी न वाहू शकल्याने संपूर्ण वस्ती तलावासारखी भरली.
रात्रीच्या अंधारात भीती, गोंधळ व अफरातफरी पसरली. अखेर स्थानिकांनीच शाळेची भिंत पाडून पाण्याचा निचरा सुरू केला. सकाळी तहसील प्रशासनाने पंचनामे करून बाधित कुटुंबांची नावे नोंदवली. लवकरच शासकीय मदत दिली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button