सावजी रेस्टॉरंट्स बंद पडतील असे बोलू नका

तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यावर बावनकुळेंचा थेट इशारा

नागपूर /6 ऑगस्ट : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी मटणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आणखी तीव्र झाला आहे. आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावजी व्यवसायाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत, अधिकार्‍यांनी अशा प्रकारची विधाने टाळावीत, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
अमरावती येथील एका कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी, मी जर सावजी मटण खाल्ले तर महिनाभर आजारी पडेन आणि हॉस्पिटलमध्ये जावे लागेल, असे वक्तव्य केले होते. या विधानानंतर सावजी रेस्टॉरंट चालक आणि विविध संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. विदर्भाच्या खाद्यसंस्कृतीचा अवमान झाल्याचा आरोपही करण्यात आला.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकाराम मुंढे यांच्या वक्तव्यावर थेट आक्षेप घेतला. सावजी हा केवळ एक
खाद्यपदार्थ नसून विदर्भाची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. तीन-चार पिढ्यांपासून हजारो कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून असून, हा विदर्भाच्या अर्थकारणाचा आणि संस्कृतीचाही महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सावजी व्यवसायाबाबत त्यांनी काय सांगितले?
सावजी ही मसाले आणि पदार्थ बनवण्याची पारंपरिक पद्धत आहे. विदर्भात येणार्‍या अनेक पर्यटकांना आणि पाहुण्यांना सावजी जेवणाचा आस्वाद घ्यायचा असतो. या मसाल्याची चव आणि पद्धत ही वेगळी असून, त्याची मागणी देशासह परदेशातही वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण सावजी व्यवसायावर नकारात्मक टिप्पणी करणे योग्य नसल्याचे बावनकुळे म्हणाले.
कारवाईबाबत सरकारची भूमिका काय?
अन्नात भेसळ आढळल्यास किंवा आरोग्याला धोका निर्माण करणारी बाब समोर आल्यास संबंधित आस्थापनावर कायदेशीर कारवाई करावी, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मात्र एखाद्या घटनेच्या आधारे संपूर्ण उद्योगालाच दोषी ठरवणे योग्य नाही. चुकी करणार्‍यांवर कारवाई व्हावी, पण संपूर्ण व्यवसायाला लक्ष्य करू नये, असे त्यांनी नमूद केले. खाद्यपदार्थ नसून विदर्भाची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. तीन-चार पिढ्यांपासून हजारो कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून असून, हा विदर्भाच्या अर्थकारणाचा आणि संस्कृतीचाही महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सावजी ही मसाले आणि पदार्थ बनवण्याची पारंपरिक पद्धत आहे. विदर्भात येणार्‍या अनेक पर्यटकांना आणि पाहुण्यांना सावजी जेवणाचा आस्वाद घ्यायचा असतो. या मसाल्याची चव आणि पद्धत ही वेगळी असून, त्याची मागणी देशासह परदेशातही वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण सावजी व्यवसायावर नकारात्मक टिप्पणी करणे योग्य नसल्याचे बावनकुळे म्हणाले. अन्नात भेसळ आढळल्यास किंवा आरोग्याला धोका निर्माण करणारी बाब समोर आल्यास संबंधित आस्थापनावर कायदेशीर कारवाई करावी, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मात्र एखाद्या घटनेच्या आधारे संपूर्ण उद्योगालाच दोषी ठरवणे योग्य नाही. चुकी करणार्‍यांवर कारवाई व्हावी, पण संपूर्ण व्यवसायाला लक्ष्य करू नये, असे त्यांनी नमूद केल

संबंधित बातम्या

Back to top button