तुमचे पाप देशातील जनता कधीच माफ करणार नाही
वंदे मातरम् मुद्द्यावरून अमित शाह यांची सोनिया गांधींवर टीका

नवी दिल्ली/16 ऑगस्ट : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले की, मतपेढीच्या राजकारणाच्या लालसेपोटी काँग्रेसने ‘वंदे मातरम्’ला विसरले होते. त्यांनी सांगितले की, लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम्’ला पुन्हा एक नवे आयुष्य देण्याचे काम केले आहे.
’तुमचे हे पाप देशातील जनता कधीच माफ करणार नाही’, वंदे मातरम् मुद्द्यावरून अमित शाह यांची सोनिया गांधींवर टीका
राजस्थानमधील चित्तौडगड येथे अमित शाह यांनी दावा केला की, काँग्रेसच्या मुख्यालयात ‘वंदे मातरम्’ गायले जात होते. गान सुरू असताना सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षांना ते गाणे थांबवण्यास सांगितले. सोनिया गांधी यांचे हे पाप देशातील जनता कधीही माफ करणार नाही, असे शाह म्हणाले.
अमित शाह म्हणाले की, 80 वर्षांनंतर बंकिम बाबूंच्या या अमर गीताला पुन्हा सन्मान मिळत आहे, हेही सोनिया गांधींना सहन होत नाही. ते पुढे म्हणाले, सोनिया जी, 140 कोटी जनता तुम्हाला पाहत आहे. तुम्ही केलेले हे पाप देशातील जनता कधीही माफ करणार नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले की, ‘वंदे मातरम्’ हे गीत अर्धवट सोडले जावे, असा विचार कोणी स्वप्नातही कसा करू शकतो? काँग्रेसवाल्यांना लाज वाटली पाहिजे. अजून थोडीही लाज शिल्लक असेल, तर दोन्ही हात जोडून बंकिम बाबूंच्या अमर आत्म्याची आणि देशातील जनतेची माफी मागावी.दरम्यान, रविवारी अमित शाह यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासोबत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.
एका जाहीर सभेला संबोधित करताना राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी हे तीन वेळा देशाचे पंतप्रधान होते. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली 1999 मध्ये पोखरण येथे अणुचाचणी झाली आणि त्याच वर्षी भारताने कारगिलचे युद्ध जिंकले. हेच काम पुढे नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून भारताला एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून जागतिक पटलावर प्रस्थापित केले.




