अनिल अंबानींच्या 3 हजार कोटींच्या मालमत्तांवर टाच

मुंबई– अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढल्या आहेत कारण ईडीने त्यांच्या विरोधात कावराई करत 3 हजार कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या मालमत्तांमध्ये ऑफिसेस, आलिशान फ्लॅट्स आणि जमिनींचा समावेश आहेत. या मालमत्ता दिल्ली, मुंबई, नोएडासह इतर शहरांमध्ये आहेत. विशेष बाब म्हणजे अनिल अंबानी यांच्या पाली हिल येथील बंगल्यावरही जप्तीची कारवाई ईडीने केली आहे.




