आजपासून शहरातील पाणीपुरवठा बंद
बिल थकीत असल्याने कंत्राटदार संपावर

* लाखो रुपयांची बिले एका वर्षापासून थकीत
अमरावती /16 ऑक्टोबर – अमरावती-बडनेरा शहरातील 8,00,000 लोकसंख्या असलेल्या नागरिकांना 17 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या अगदी वळेपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विंचत राहावा लागू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी सप्टेंबरपासूनच याबाबतची सूचना दिली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, गेल्या वर्षभरातील बिले प्रलंबित आहेत आणि गेल्या अनेक महिन्यांपासून प्राधिकरणाशी पत्रव्यवहार करूनही नागरिकांना कोणतेही पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे 17 ऑक्टोबरपासून सप्टेंबरच्या बिलांसाठी पाणीपुरवठा थांबवण्याची सूचना देण्यात आली असून, यामुळे नागरीकांना पाणीपुरवठ्यात विस्कळीतता निर्माण होण्याची शक्यता आहे.




