नवसारी प्रभागातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी आशादिप फाउंडेशनचा पाठपुरावा

अमरावती /26 मे: अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नवसारी प्रभाग क्रमांक 3 अंतर्गत येणार्‍या विविध वसाहतींमधील स्वच्छता आणि प्रलंबित विकासकामांबाबत आशादिप फाउंडेशनतर्फे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. यामध्ये राममोहन नगर, छत्रसाल नगर, किशोर कॉलनी, गजानन कॉलनी, न्यू हनुमान नगर, सुरभी विहार, विद्युत नगर, अजिंक्य कॉलनी आदी परिसरांचा समावेश आहे.
मनपा प्रशासनाने काही मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल फाउंडेशनने आभार मानले आहेत. मात्र, उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून लहानसहान समस्या सोडवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.
फाउंडेशनने प्रकाश व्यवस्था सुरळीत करणे, फॉगिंग करणे, भरलेली नाले स्वच्छ करणे, झाडांची छाटणी आदी कामांसाठीही प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. कठोरा ते व्हीएमव्ही परिसरात 1300 जलपात्रांचे वाटप निसर्ग मित्रांमार्फत करण्यात आले.
पर्यावरणाच्या दृष्टीने दुर्लक्षित मूर्तींचे संकलन करून त्या रामपुरी कॅम्प झोन कार्यालयात सुपूर्त करण्यात आल्या. व्हीएमव्ही मागील रस्त्याची दुरुस्ती आवश्यक असून, त्या संदर्भात लवकरच मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांची भेट घेऊन चर्चा केली जाणार असल्याची माहिती मनिष जाधव यांनी दिली.

संबंधित बातम्या

Back to top button