दिल्लीतील आंदोलनात उपद्रवी तत्वांची मोठी घुसखोरी

भाजप खा. डॉ. अनिल बोंडे यांचा गंभीर आरोप

नीट परीक्षेच्या निमित्ताने देशविरोधी कट रचला

पंतप्रधान मोदींनी समाजकंटकांचे षड्यंत्र उधळल

अमरावती /2 ऑगस्ट – नीट परीक्षेच्या गोंधळाचे निमित्त साधून दिल्लीत पार पडलेल्या निदर्शनांमध्ये उपद्रवी तत्वांनी घुसखोरी केली असून भारतात बांगलादेश आणि नेपाळसारखी अराजकता माजवायचा मोठा आंतरराष्ट्रीय कट रचला गेला होता असा थेट आरोप अमरावतीतील कार्यक्रमात करण्यात आला. अमरावतीत पार पडलेल्या विशेष सोहळ्यात बोलताना देशात अशांतता पसरवण्याच्या हेतूने भारत आणि परदेशातून एक मोठी साखळी कार्यरत होती असा दावा करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधल्यामुळे हा मोठा कट उधळला गेला. काँग्रेसच्या काळात असे प्रकार दाबले गेले असते पण सध्याच्या सरकारने तात्काळ कडक कायदा आणून दोषींवर कडक कारवाई केली. 22 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ नये म्हणून केवळ एका महिन्यात अत्यंत सुरक्षितपणे विमानाने प्रश्नपत्रिका आणून पुन्हा परीक्षा घेण्यात आली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता तरुण पिढीवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असून हे संपूर्ण वर्ष तरुणाईला समर्पित केले जाईल.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अमरावती शहर आणि जिल्ह्यात ’सेवा समर्पण दशक’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात बोलताना देशातील आणि राज्यातील घडामोडींवर जोरदार भाष्य करण्यात आले. नीट परीक्षेच्या वेळी दिल्लीत झालेल्या आंदोलनात उपद्रवी मंडळी शिरली होती. त्यांचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे हा नव्हता तर देशात गोंधळ आणि दंगल घडवणे हाच होता. परदेशातील काही घटकांच्या मदतीने देशाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू होता, मात्र केंद्र सरकारने वेळेत योग्य पावले उचलल्यामुळे हा डाव पूर्णपणे फसला.या कार्यक्रमात देशातील नव्या पिढीचा उल्लेख करत ’जेन झी’ आणि ’जेन अल्फा’ या तरुणाईला विकसित भारत आणि समृद्ध महाराष्ट्राच्या प्रवासात सोबत घेतले जाईल असे सांगण्यात आले. यावर्षी तरुणांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांत उत्तम यश मिळवणार्‍या गुणवंत मुला-मुलींचा विशेष सत्कार करून त्यांना पाठबळ देण्यात आले.वर्ष 2014 सालापासून भारत देश जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण करत असून महासत्तेच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यामुळे आज तिथे आनंदाने भारतीय तिरंगा फडकवला जात आहे. यासोबतच राज्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा देत वीज बिल माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. या भव्य सोहळ्याला भाजप आ. प्रवीण पोटे, आ. राजेश वानखडे, आ. प्रताप अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी, माजी आ. रमेश बुंदिले, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, तुषार भारतीय, निवेदिता चौधरी, चेतन गावंडे, किरण पातुरकर, शिवराय कुलकर्णी, प्रा. दिनेश सूर्यवंशी, नितीन गुडधे, शिक्षक नेत्या संगीता शिंदे, नितीन धांडे, डॉ. वसुधा बोंडे, माजी सभापती विक्रम ठाकरे, अचलपूरच्या नगराध्यक्ष रुपाली माथने, शेंदूरजना घाटच्या नगराध्यक्ष सुवर्णा वरखेडे, वरुडचे ईश्वर सलामे, नगरसेविका डॉ. मधुरा काहाळे, डॉ. विलास कविटकर, चेतन पवार, बाळासाहेब हिंगणीकर प्रियंका मालठाने, अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सलीम घानीवाले, नकुल सोनटक्के यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button