विदर्भात पुढील 5 दिवस पावसाचा जोर
हवामान विभागाने दिला इशारा

अमरावती । 13 जुन– महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत हवामानात मोठा होणार असून, राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः 13 ते 17 जून या कालावधीत कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. 13 जूननंतर पुन्हा राज्यातील काही भागात मान्सूनचे वारे सक्रिय होणार असून 15 जूननंतर संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस येईल. भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या प्रगतीवर महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. 15 जूननंतर राज्यात पाऊस येणार आहे. मान्सूनची प्रगती चांगली राहिली तर त्याचा फायदा मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना होईल. वादळी वार्यासह मुसळधार पाऊस राहील.पावसाच्या सगळ्यात जास्त सरी कोकण-गोवा भागात पडणार आहेत. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून (खचऊ) येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया अमरावती, आणि अकोला या जिल्ह्यांसाठी बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. सध्या मान्सूनने महाराष्ट्रात सुरुवात तर केली असली, तरी सुरुवातीला त्याचा वेग मंदावला होता. मागील पंधरा दिवसांपासून अनेक भागांमध्ये मान्सूनच्या सरी कमी पडल्या होत्या, त्यामुळे तापमानात वाढ झाली होती आणि नागरिक उकाड्याने त्रस्त होते. मात्र आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रीय होऊ लागले आहेत आणि राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिक आणि प्रशासन या सगळ्यांनाच यापुढील काळात विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.