अमरावती खुल्या कारागृहातून कैदी फरार
आरोपीच्या शोधात दोन पोलिस पथके रवाना

*फ्रेझरपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अमरावती /13 जून: स्थानिक मध्यवर्ती कारागृहाच्या खुल्या तुरुंगातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक कैदी पळून गेला. ही घटना 12 जून रोजी दुपारी 3.30 वाजता घडली. या प्रकरणात, तुरुंग अधिकार्याच्या तक्रारीवरून फ्रेझरपुरा पोलिसांनी कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्रेझरपुरा पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक पळून गेलेल्या कैद्याच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले आहेत. पळून गेलेल्या कैद्याचे नाव बद्री रिचू मुचालदे (39) असे आहे, तो मध्य प्रदेशातील बिकनगाव येथील रहिवासी आहे. प्राप्त माहितीनुसार, बद्री मुचलदेला खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2018 मध्ये त्याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. दीड वर्षांपूर्वी त्याला येथील खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते. गुरुवार, 12 जून रोजी दुपारी 3.30 वाजता, बद्रीला शेतीच्या कामासाठी इतर 17 कैद्यांसह बॅरेकमधून बाहेर काढण्यात आले होते. शेतात काम करत असताना, तो तुरुंग पोलिसांना चकमा देऊन पळून गेला. ही माहिती मिळताच तुरुंग प्रशासनात खळबळ उडाली. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. पण तो कुठेही सापडला नाही. त्यानंतर फ्रेझरपुरा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. फ्रेझरपुराचे ठाणेदार नीलेश करे त्यांच्या पथकासह मध्यवर्ती तुरुंगात पोहोचले. पळून गेलेल्या कैद्याचा जंगल परिसरात आणि इतर ठिकाणी शोध घेण्यात आला असता तो सापडला नाही. अखेर रात्री या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या सूचनेनुसार, पळून गेलेल्या कैद्याचा शोध घेण्यासाठी फ्रेझरपुरा आणि गुन्हे शाखेच्या दोन पथके तयार करण्यात आली आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे.