अमरावतीच्या प्रमोद राठी यांचा मुलगा ठरला भाग्यवान
प्रणव दीड तासापूर्वीच त्या विमानातून उतरला होता

*विमानातील फक्त स्क्रीन बंद होती
*पारूल विद्यापीठाचे शिष्टमंडळ गेले होते लंडनला
अमरावती /13 जून: अमरावतीचा एका सामान्य कुटुंबातून आलेला प्रणव प्रमोद राठी खूप भाग्यवान ठरला. गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या विमानात लंडन ते अहमदाबाद असा 9 तासांचा प्रवास केल्यानंतर प्रणव राठी दुपारी 12 वाजता अहमदाबाद विमानतळावर उतरला होता. आमच्या प्रतिनिधीशी दूरध्वनीवरून बोलताना प्रणवने सांगितले की, दुपारी 2 वाजता जेव्हा हा भयानक अपघात झाला त्यावेळी आम्ही अचंबित झालो. सर्वांनी परमेश्वराचे आभार मानले. सदर विमान तिन तास उशिराने अहमदाबादमध्ये पोहोचले होते. यादरम्यान विमानाची दुर्घटना झाली असती तर मोठा अनर्थ झाला असता. अशी भयावह परीस्थिती त्याने कथन केली. प्रणवने माहीती देतांना सांगितले की, काही वेळासाठी आम्ही सर्व स्तब्ध झालो होतो. कोणालाच काही सूचत नव्हते. प्रणव सोबत पारुल विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. देवांग पटेल व 9 प्राध्यापक होते. त्यांचे शिष्टमंडळ 3 जून रोजी लंडनला गेले होते. तेथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी 5 दिवस 5 वेगवेगळ्या विद्यापीठांना भेटी दिल्या. यामध्ये पूर्व लंडन, सरे, मिडलसेक्स आणि लंडन या विद्यापीठांचा समावेश होता. पारुल विद्यापीठाने अभ्यासक्रमांच्या देवाणघेवाणीसाठी सर्व विद्यापीठांशी करार केले आहेत. प्रणव राठी यांच्या मते, 172 क्रमांकाचे विमान लंडनच्या ग्रीनविक विमानतळावरून दोन तास उशिरा उड्डाण केले. फक्त सीटसमोरील स्क्रीन काम करत नव्हती. प्रणव राठी म्हणाले की, उर्वरित एसी आणि इतर सुविधा ठीक होत्या. त्याने सांगितले की, विमान सकाळी 9 वाजता अहमदाबाद विमानतळावर पोहोचणार होते. ते तीन तास उशिरा पोहोचले. जेव्हा पुन्हा या विमानाने उड्डाण घेतले तेव्हा शतकातील सर्वात मोठा अपघात विमानासोबत झाला. काही काळापूर्वी आपण याच विमानातून प्रवास करीत होतो हे विचार करणे भयानक वाटत होते. याबाबत ईश्वराची आभार मानने शब्दात वर्तविणे शक्य नाही, असे प्रणवने सांगितले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल त्यांना निश्चितच सहानुभूती आहे. संपूर्ण पारुल विद्यापीठाने जखम प्रवाशी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. प्रणव राठीच्या कुटुंबात त्याचे आईवडील आणि दोन बहिणी आहेत. प्रणवच्या सुरक्षिततेनंतर सर्वांनी सुटकेचा नि:ेशास सोडला आहे. तथापि, देशवासीयांप्रमाणेच त्यांनाही या अपघाताबद्दल दुःख आहे.