धन धान्य योजनेचा महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना लाभ

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेचा (झचऊऊघध) शुभारंभ उद्या, 11 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत होणार आहे. या योजनेत महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांचा समावेश असून, राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना नव्या आशा निर्माण करणारी ठरणार आहे, असे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केले. या योजनेसाठी देशभरातून शेतीत मागे असलेल्या 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button