दोन दिवसात 176 हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान

अमरावती जिल्ह्यात वादळी वार्‍याचा फटका

-केळी बागांचे सर्वाधिक नुकसान
अमरावती / 17 जून: राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले होते. हे नुकसान संपत नाही तोच अनेक भागात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस होत आहे. मॉन्सूनचा दमदार पाऊस होण्यापूर्वी राज्यात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन होत आहे. वादळी वार्‍यामुळे शेतातील पिकांचे मोट्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान 12 व 13 जून रोजी या दोन दिवसांमध्ये अमरावती जिल्ह्यात वादळी वार्‍यासह झालेल्या तब्बल 176 हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर केला आहे.
राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले होते. हे नुकसान संपत नाही तोच अनेक भागात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस होत आहे. जोरदार वारा असल्यामुळे सध्या शेतात उभ्या असलेल्या फळ बागांना याचा फटका बसत आहे. अमरावती जिल्ह्यात देखील दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वार्‍यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
सर्वाधिक केळी पिकांचे नुकसान झालं असून खरीप हंगामाच्या तोंडावर बळीराजा अडचणीत सापडला आहे. यावर्षी अवकाळी व मान्सूनपूर्व पावसाचा मोठा फटका अमरावती मधील शेतकर्‍यांना बसला आहे. कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या शेती पिकांचा पंचनामा करून अहवाल राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई सरकारने द्यावी; अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button