स्वच्छ, सुंदर अमरावतीसाठी वृक्षारोपणाची लोक चळवळ निर्माण करण्याची गरज

आ.सुलभाताई खोडके यांचे प्रतिपादन

 * जागतिक पर्यावरण दिनी अमरावती महापालिका क्षेत्रात वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ

अमरावती /5 जून: ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणात झालेले किंवा होत असलेले बदल बघता, स्वच्छ,हरीत आणि सुदंर अशा पर्यावरणाची कास धरणे व प्रदूषण मुक्त नैसर्गिक वातावरणाची निर्मिती करणे आवश्यक आहे. दोनवर्ष कोरोना काळात ऑक्सीजनची कमतरता निर्माण झाली होती. तर सद्या ऋतुचक्रात बदलत चालले असल्याने वातावरणात प्रचंड दाहकता निर्माण होतांना दिसत आहे. बदलत्या वातावरणामुळे जनजीवन प्रभावित होत आहे. हे असेच चालत राहिले, तर वसुंधरेवर जनजीवन धोक्यात येईल. पर्यावरणाचा असमतोल व ग्लोबल वार्मिंग पासून जर वसुंधरेला वाचवायचे असल्यास मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे. म्ह्णून आपल्या सभोवतालच्या परिसरात वृक्ष लागवड करणे हि कुण्या एकट्याची जबाबदारी नसून ती एक लोकचळवळ बनली पाहिजे, असे प्रतिपादन आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी केले.
अमरावती शहर हे स्वच्छ, सुंदर व हरित बनविण्याच्या उद्देशाने आज दिनांक 5 जुन 2025 रोजी जागतिक पर्यावरण दीना निमित्य वृक्षारोपण करून आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते अमरावती महापालिका क्षेत्रातील वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. काठोरा नाका स्थित विजय कॉलनी मधील मनपाच्या खुल्या मैदानात विविध प्रजातींच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले. ऑक्सीजनयुक्त झाडे व वनस्पतीयुक्त झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी अमरावती महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, मनपा उपायुक्त महेश देशमुख , डॉ. मेघना वासनकर, योगेश पीठे, नरेंद्र वानखडे, माजी नगरसेवक प्रशांत डवरे, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, मनपा शिक्षणाधिकारी प्रकाश मेश्राम, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उद्यान अधीक्षक श्रीकांत गिरी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलतांना आ.सुलभाताई खोडके म्हणाल्या कि, दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत असून जागतिक तापमानवाढीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. वृक्ष संतुलन राखले जावे. पर्यावरण जोपासावे. याकरिता वृक्ष संवर्धन ही काळाची खरी गरज आहे. लवकरच पावसाळा सुरु होत असून अमरावती शहरातील ओपन स्पेस, गार्डन व रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे महत्वाचे आहे. एक व्यक्ती एक झाड या संकल्पनेतून सर्वानी वृक्ष लागवड करून, वृक्षांचे संगोपन करून वृक्ष पालकत्व घेणे महत्वाचे आहे. सर्वांनी आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये विविध प्रजातींची वृक्ष लागवड करून पर्यावरण पूरक जीवनशैली चा अंगीकार करण्याचे आवाहन सुद्धा आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्य वृक्षरोपण कार्यक्रमाने अमरावती विधानसभा मतदार संघातील वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत गत काळात शहरातील काही मनपाच्या खुल्या प्रांगणांना चैनलिंग फेन्सिंग करून त्याठिकाणी चांगली सुविधा निर्माण करण्यात आली आहे. हा परिसर सुशोभित,सुंदर व हरित राहावा तसेच माणसाचे नाते निसर्गाशी जोडण्याचा घेऊन त्या ठिकाणी आता वृक्षारोपण करण्यात येत असून कडुनिंब , पिंपळ, वड , बेल ,आवळा , आंबा अशी झाडे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी वृक्ष लागवड अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button