‘आपले शहर-हिरवे शहर’ अभियानाचा भव्य शुभारंभ
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

* आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटनेच्या पुढाकाराने 15 टप्प्यांमध्ये होणार वृक्षारोपण
* बालाजी मंदिर परिसरातून मोहिमेची सुरुवात
अचलपूर /5 जून: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटनेच्या वतीने ‘आपले शहर – हिरवे शहर’ या वृक्षारोपण मोहिमेचा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला. जुडवा नगरीत जून ते सप्टेंबर या कालावधीत एकूण 15 टप्प्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार असून, या मोहिमेची सुरुवात तिरुपती नगरमधील बालाजी मंदिर परिसरात झाली.
या उपक्रमात सामाजिक, पर्यावरणीय तसेच राजकीय संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येऊन पुत्रजीवा, उंबर, अशोक यांसारखे दुर्मिळ वृक्ष तसेच जांभूळ, बेलपत्र, चिंच, पिंपळ, वड यांसारखे प्राणवायू देणारे व जीवनदायी वृक्ष लावण्यात आले. उपस्थितांनी केवळ रोपण न करता या झाडांच्या संगोपनाचीही जबाबदारी घेतली.
कार्यक्रमाची सुरुवात माहेर फाउंडेशनच्या दीपा तायडे व शारदा उईके यांच्या हस्ते वृक्षपूजनाने करण्यात आली. त्यानंतर पर्यावरणाचे महत्व, वृक्षांचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल राखण्याच्या गरजेवर योगेश खानझोड़े, अभिजीत कालमेघ, राजा धर्माधिकारी, गजानन कोल्हे, अंकुश भिडकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप राजा पिंजरकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. यावेळी अभिजीत कालमेघ, राजा पिंजरकर, विजू मिश्रा, सुधीर देशमुख, सागर वाटाने, पुरोहित महाराज, अंकुश भिडकर (ग्रामपंचायत सदस्य), सुरेंद्र आठवले, अंबादास नाडुळे, योगेश खानझोड़े (शकुंतला रेल बचाव समिती प्रमुख), गजानन कोल्हे, राजा धर्माधिकारी, सुरेश प्रजापती, प्यारेलाल प्रजापती, संजय डोंगरे, संतोष नरेडी, रामदास मसने, एस.बी. बारखडे, कमल केजरीवाल, राजकुमार बर्डिया, वसंतराव धोबे, मुरलीधर पडोळे, संजय कोरे, माहेर फाउंडेशनच्या शारदा उईके व दीपा तायडे कनिष्ठ अभियंता कपिल नंदगावकर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल गोहाड व राहुल वैद्य आदींची उपस्थिती होती.
सहभागी सामाजिक संस्था: 1. अध्यक्ष व समस्त पदाधिकारी, आदिवासी पर्यावरण सामाजिक विकास संघटन, महाराष्ट्र प्रदेश, 2. अभिजीत भाऊ कालमेघ मित्रमंडळ, परतवाडा-अचलपूर, 3. शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती, अचलपूर, 4. माहेर फाउंडेशन, परतवाडा, 5. मानव सेवा समिती, परतवाडा, 6. तिरुपती रॉयल्स, तिरुपती नगर, गौरखेडा, 7. ग्रामपंचायत, गौरखेडाया वृक्षारोपण अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे शहर हिरवेगार करणे, प्रदूषण मुक्त करणे तसेच पर्यावरण जपण्याविषयी जनजागृती निर्माण करणे हा आहे. या मोहिमेत दररोज विविध परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार असून, त्यांचे संगोपन व संवर्धन हेसुद्धा प्राधान्याने केले जाणार आहे.