17 वर्षीय विद्यार्थ्यासह जिल्ह्यात चार जणाची आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट नाही

अमरावती /11 डिसेंबर – गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील ग्रामीण भागात 17 वर्षीय विद्यार्थ्यासह चार जणांनी आत्महत्या केल्या आहेत. या चारही घटना धारणी, अंजनगाव सुर्जी, आसेगाव पूर्णा आणि बेनोडा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडल्या. 1 डिसेंबर रोजी झालेल्या चारही आत्महत्या अपघाती मृत्यू म्हणून नोंदवण्यात आल्या.
धारणी तहसीलमधील तातारा येथे एका 36 वर्षीय महिलेने तिच्या घरात गळफास घेतला. मृत महिलेचे नाव रोशनी राजेश जावरकर (36) आहे. ही घटना 8 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता घडली. धारणी पोलिसांनी 9 डिसेंबर रोजी अपघाती मृत्यूची नोंद केली. अर्धांगवायूने ग्रस्त असलेल्या 65 वर्षीय पुरूषाने गळफास घेतला. ताराचंद नानाजी दाभाऊ , रा. कोल्हा, ता.अचलपूर असे मृताचे नाव आहे. 9 डिसेंबर रोजी सकाळी कोल्हा फार्म परिसरातील लेंडी नाल्याजवळ तो लटकलेला आढळला. मृताचा पुतण्या आशिष दाभाडे यांनी आसेगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली की, त्यांच्या काकांनी अर्धांगवायूमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानुसार, पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली. वरुड तहसीलमधील सावंगा येथे 70 वर्षीय महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी बेनोडा पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला. मृत महिलेचे नाव चंद्रभागा देवीदास सानेसर (70, सावंगा) आहे. चंद्रभागा दारूचे व्यसन असल्याने तिने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली, असे तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button