शेतकर्यांसोबत जरांगे पाटील नागपूरला रवाना! बच्चू कडूंना देणार समर्थन

जालना/29 ऑक्टोबर – मनोज जरांगे पाटील नागपूरकडे र वाना झाले आहेत. ते माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वा खाली शेत कर्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.मनोज जरांगे पाटीलच्या नागपूर आगमनामुळे आंदोलनात सहभागी होणार्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, तसेच विदर्भातील शेतकरी आंदोलनास अधिक बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या आहेत.
त्याचबरोबर गरीरपसश झरींळश्र जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे नियोजित बैठक रद्द केल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, शेतकरी आणि शेतकर्यांचा जीव एकच दिसला पाहिजे. सध्या नागपूरमध्ये आंदोलन सुरू आहे, त्यामुळे दोन जागेवर आंदोलन नको. इकडे आंदोलन सुरू असताना इकडे बैठक घेणं शोभण्यासारखं नाही.जरांगे पाटील यांनी पुढे सूचित केले की, नागपूरमधील आंदोलनातून सरकार शेतकर्यांच्या मागण्या मान्य करत नाही, तर त्यानंतर बैठक घेऊन त्या मागण्या सरकारकडे कशा मांडायच्या यावर चर्चा केली जाईल. त्यांनी हा निर्णय घेऊन सध्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखवले आहे.या निर्णयामुळे विदर्भातील शेतकर्यांमध्ये एकजूट आणि आंदोलनाची ताकद अधिक दृढ होईल
राज्यातील महायुती गरीरपसश सरकारविरोधात शेतकरी आंदोलन उग्र होत आहे. माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकर्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला असून, या मोर्चात प्रमुख शेतकरी नेतेही सहभागी झाले आहेत.मोर्चात महादेव जानकर यांनी आक्रमक भाषण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी स्पष्ट केले की, सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार. जेलमध्येही जायला आम्ही तयार आहोत, पण मागे हटणार नाही.जानकर यांनी सरकारला इशारा देत म्हटले की, सरकार बदलल्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांना शांत बसू देणार नाही. महाराष्ट्रात आम्ही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरू. आमच्या मोर्चाचा लोकशाही मार्ग आहे, पण तो कुणाला दिसत नाही. जनता कोर्ट आहे. जोपर्यंत नेते सांगत नाहीत, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. महाराष्ट्रातील एकही जेल रिकामा ठेवणार नाही. आमच्या माणसांना घेऊन जा, आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत.शेतकर्यांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे की, सरकार मागे हटतंय की आम्ही हटतोय हे आम्हाला बघायचे आहे. देवेंद्र फडणवीस, तुमचा बिस्तारा नागपूरला आणल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही.राज्यातील शेतकरी आंदोलन हळूहळू तणावपूर्ण रूप घेऊ लागल्याचे तज्ज्ञांचे मत आहे, आणि आगामी दिवसांत या आंदोलनाचे परिणाम सरकारवर किती पडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




