मानाची श्री रुख्मिणी मातेची माहेरची महाराष्ट्रातील प्रथम पालखी

श्री क्षेत्र कौंडण्यपूर ते श्री क्षेत्र पंढरपूर

कुर्‍हा /30 मे: आषाढी एकादशी जशी जवळ येते तशी वारकर्‍यांची पंढरपूर वारीची लगबग सुरु होते भूवैकुंठ पंढरपूरला जाण्यासाठी वारकरी निरनिराळ्या दिंडीत ( पालखीत)सहभागी होतात. सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने कूच करतात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, मुक्ताई ह्यांच्या पालख्या तर विदर्भातून संत गजानन महाराज व इतर पालख्या निघतात. पण वैशिष्ट्यपूर्ण आहे ती श्री विठ्ठल रुख्मिणी संस्थांनची श्री क्षेत्र कौंडण्यपूर (विदर्भ) येथील मानाची श्री रुख्मिणी मातेची माहेरची पालखी. विदर्भातील श्री क्षेत्र कौंडण्यपूरला हजारो वर्षाचा इतिहास आहे .श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे विदर्भातील अति पुरातन तीर्थक्षेत्र असून असून विदर्भराज भीमक राजाची राजधानी होय. माता रुख्मिणीमातेचे माहेर आहे तसेच पाच सतीचे माहेर आहे प्रभुरामचंद्रांची आजी राजा दशररथाची आई इंदुमती ,अगस्ती पत्नी लोपामुद्रा ,भगीरथ राजाची माता केशिनी व नल राजाची राणी दमयंती. महाभारत कालीन ह्या पुरातन तीर्थक्षेत्रात श्री रुख्मिणीमातेचे जन्मस्थानी पुरातन मंदिर आहे व त्यापासून 1 कि मी अंतरावर श्री अंबामातेचे पुरातन मंदिर असून ह्याच मंदिरातून श्रीकृष्ण भगवंताने श्री रुख्मिणी मातेचे हरण केले होते. श्री भागवतात ह्याचा उल्लेख आहे.
येथे जवळपास 450 वर्षांपूर्वी श्री संत सद्गुरू सदाराम महाराज होऊन गेले . श्री सदाराम महाराजांनी श्री क्षेत्र कौंडण्यपूर ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी वारी 1594 साली सुरु केली ती परंपरा आजतागायत सुरु असून वारीचे (पायदळ दिंडीचे) हे 431 वे वर्ष आहे. आई श्री रुख्मिणीमातेच्या माहेराहून निघालेली हि माहेरची पालखी महाराष्ट्रातील पहिली पालखी आहे . वृद्धापकाळामुळे श्री संत सद्गुरू सदाराम महाराजांना वारी करणे श्यक्य झाले नाही त्यावेळी पांडुरंगाचा धाव केला असता श्री भगवान पांडुरंगाने स्वतः श्री संत सदाराम महाराजांना दर्शन देऊन मी दर वर्षी आषाढी व कार्तिक पौर्णिमा व प्रतिपदेला श्री क्षेत्र कौंडण्यपूर येईन असे वचन दिले. तीच परंपरा आजतागायत सुरु आहे ह्यावर्षी पालखीचे प्रस्थान दि 31 मे 2025 रोजी श्री पालखी प्रमुख क्षेत्र कौंडण्यपूर येथून संस्थांनचे अध्यक्ष नामदेवराव अमाळकर ,सचिव तथा सोहळा प्रमुख सदानंद साधू, वसंत डाहे सुरेश चौहाण विश्वस्त अशोकराव पवार, डॉ रामकृष्ण करड ,सत्यनारायण चांडक ,अतुल ठाकरे,हरीश मुंदडा,सौ धनश्री ताई दिवे सौ शुभांगी काळे हभप पंकज महाराज महल्ले व्यवस्थापक कपिल गावंडे व हजारो वारकर्‍यांच्या उपस्थितीत होणार आहे
पालखीत दररोज भजन, हरिपाठ,कीर्तन ह्यासारखे नित्य कार्यक्रम असतात गेली कित्येक वर्षे पिढ्यानपिढ्या सेवा करणारी ठिकठिकाणची गावकरी मंडळी अत्यंत उत्साहाने पालखीचे मार्गात स्वागत करतात 33 दिवसांच्या दीर्घ प्रवासानंतर दररोज अंदाजे 15/20 किलोमीटर प्रवास करून अमरावती कारंजा,वाशीम, परभणी बीड उस्मानाबाद आणि सोलापूर ह्या जिल्ह्यातून प्रवास करून दिनांक 3 जुलै 2025 रोजी पालखी पंढरपूर प्रवेश करणार आहे तसेच दिनांक 30 जून 2025 ला माढा मुक्कामी रिंगण सोहळा पार पडतो .दिनांक 3 जुलै 2025 ते दि 10 जुलै 2025 पर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूरला असून दिनांक 10 जुलै 2025 रोजी परतीचा प्रवास आहे. .निवडक मानाच्या नऊ पालख्यांमध्ये श्री रुख्मिणी मातेची पालखी असून प्रस्थानापासून ते पंढरपूर पर्यंत पालखीचे सर्व जिल्ह्यात उस्फुर्त स्वागत केल्या जाते आणि विशेषतः सोलापूर जिल्हा प्रवेशाचे वेळी शासनातर्फे पालखीचे मु.पाथरी,जिल्हा सोलापूर येथे अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात येते व नंतर शासन नियुक्त अधिकारी पोलीस पदाधिकारी सतत पालखीसोबत असतात तसेच पंढरपूरला पालखीला विशेष मान असतो व श्री रुख्मिणीमातेला पंढरपूर संस्थान कडून अहेर करतात व तसेच दशमी ते पौर्णिमे पर्यंत श्री विठ्ठलाला कौंडण्यपूरचा नैवैद्य असतो .गेली 431 वर्षांपासून पालखीची परंपरा जोपासली जाते.
कोरोना काळातही सतत दोन वर्षे शासनाने निवडक 40 वारकर्‍यांसोबत विशेष शिवशाही बसची व्यवस्था करून सोबत पोलीस बंदोबस्त ,प्रशासकीय अधिकारी देऊन पालखीची व्यवस्था केली होती त्यावेळी संस्थांचे पदाधिकारी यांनी विदर्भातील प्रमुख दिंडीमधील एक वारकरी घेऊन सर्वव्यापक परिचय दिला .त्यामुळे 431 वर्षाची परंपरा खंडित झाली नाही .जवळ जवळ 250/300 वारकरी पालखीत सामील असतात दिनांक 3 जुलै 2025 ते दि 10 जुलै 2025 पर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूरला. श्री विठ्ठल रुख्मिणी मातेच्या संस्थांच्या धर्मशाळेत असतो तेथे रोज कीर्तन भजन व हरिपाठ होतो तसेच हजारो वारकरी श्री रुख्मिणी मातेच्या दर्शनाला येतात दिनांक 10 जुलै 2025 रोजी काला होऊन परतीचा प्रवास होतो. दिनांक दिनांक 11 जुलै 2025 या प्रतिपदेला श्री क्षेत्र कौंडण्यपूरला हजारो वारकर्‍यांच्या उपस्थितीत कीर्तन आणि दहीहंडी उत्सवाने यात्रेची सांगता होते इतकी प्राचीन परंपरा विदर्भात असून देखील त्याची माहिती व प्रसिद्धी आजपर्यंत झाली नाही.
येवढा ऐतीहासीक वारसा लाभलेली व पालखी सोहळ्याचा उगम असलेली पालखी अनेक वर्ष दुर्लक्षित होती आता मात्र शासनाने मानाची पालखी असल्यामुळे अनेक सोइ सुविधा उपलब्ध करून दिल्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री नामदार मा देवेंद्रजींनी सर्व मानाच्या पालख्यांच्या सोइ सुविधांकडे जातीने लक्ष दिले असून श्री रुख्मिणी मातेच्या पालखीला देखील सर्व सोइ सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. श्री क्षेत्र कौंडण्यपूरला तीर्थक्षेत्र ब दर्जा दिला असून. तीर्थ क्षेत्र अ दर्जा मिळावा ह्यासाठी प्रयत्न चालू आहे संस्थानने देखील अनेक सार्वजनिक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे जवळ जवळ 5 गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ,वैद्यकीय तपासणी शिबीर ,दार एकादशीला आयुर्वेदिक धर्मार्थ दवाखाना ,कोरोना काळात देखील संस्थानतर्फे अनेक गरजू लोकांना धान्य वाटप करण्यात आले होते . भक्तांचा आषाढी व कार्तिकीला लाखो लोक श्री क्षेत्र कौंडण्यपूरला दर्शनाला येतात ओघ वाढत आहे व श्री क्षेत्र कौडण्यपूर हे रुख्मिणी मातेचे माहेर लवकरच गत वैभवाला व नावारूपाला येईल व अखंडपणे पालखीची सोहळ्याची परंपरा उत्साहात वाढत जाईल व वृद्धिंगत होईल ह्यात शंका नाही

संबंधित बातम्या

Back to top button