राज्यात पावसाचे तांडव; 16 जिल्ह्यांना रेड अलट

मुंबई जलमय, जनजीवन विस्कळीत

*शेती व जनावरांवर घाला, नद्या धोकादायक स्थितीत
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले पंचनाम्यांचे आदेश

मुंबई / 18 ऑगस्ट : श्रावण महिन्यात पावसाने राज्यभर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा व विदर्भात बरसणारा पाऊस आता मुंबई, कोकण व घाटमाथ्याकडे वळला असून, पुढील दोन दिवस या भागांसाठी निर्णायक ठरणार आहेत. हवामान खात्याने 25 ते 28 जुलैदरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील सध्याच्या मुसळधार पावसामागे तीन प्रमुख हवामान प्रणाली कार्यरत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होण्याच्या मार्गावर आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्रीय स्थितीसक्रिय झाली आहे, तर दक्षिण कोकण ते केरळपर्यंत द्रोणीय रेषा निर्माण झाली आहे. या तिहेरी संगमामुळे महाराष्ट्रात मुसळधार पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून राज्यभर पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना 25 ते 27 जुलै दरम्यान ऑरेंज अलर्ट तर अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळसह मराठवाड्यातील जालना, बीड, हिंगोली, परभणी आदी जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजधानी मुंबईत पहाटेपासून कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे दादर, माटुंगा, वडाळा, परळ,लालबाग, माहीम आदी सखल भाग जलमय झाले. अंधेरी सबवे बंद पडला, तर पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक संथगतीने शाळा बंद करण्याचा निर्णय दुपारी घेण्यात आला. माटुंगा पोलिस स्टेशनजवळ पाण्यात अडकलेल्या स्कूल बसमधील विद्यार्थ्यांना पोलिसांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांना आंघोळ करण्यास सांगितले. विष्णापुरी, लड्डी आणि इतर ठिकाणच्या काही धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. जगबाडू आणि वशिष्ठ नद्यांसह काकेनमधील नद्यांची पाण्याची पातळी पूर पातळीपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या मते, माबिनी, काकेन, पानू आणि सातारा घाटांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच राहील. विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि प्रशासन बचाव कार्यासाठी सज्ज झाले आहे. बाधित भागात एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत. पावसामुळे राज्यभर सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे, लोक, प्राणी, वाहने आणि पायाभूत सुविधा वाहून गेल्या आहेत. महाराष्ट्रासाठी येणारे दिवस ‘महत्वाचे’ असतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

*चार लाख हेक्टरवरील पिके बाधीत

राज्यातील चार लाख हेक्टरवरील पिकं बाधित झाली आहेत. विशेषत: मराठवाडा विभागात मोठं नुकसान झालं आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ढगफुटीसदृश्य पावसामुळे लेंडी नदीला पूर आला. यात दुग्ध व्यवसाय करणार्‍या शेतकरी बालाजी खंकरे यांचे गोठे जलमय झाले. त्यांच्या चाळीसहून अधिक म्हशी गुदमरून मृत्युमुखी पडल्या, तर काही वाहून गेल्या. या घटनेत कोट्यवधींचे नुकसान झालं असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बीड, लातूर, जळगाव जिल्ह्यातही पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. पिकांसह जनावरांचा जीवही पावसाच्या पाण्यात वाहून जात असल्याने शेतकर्‍यांवर मोठं संकट आलं आहे.

*राज्य सरकार सज्ज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतला. ‘राज्यातील 15 ते 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या पोर्शभूमीवर एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्कराच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत,’ अशी माहिती त्यांनी दिली. ‘नागरिकांनी आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे,’ असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच, धोक्याच्या भागात प्रशासन सज्ज राहावे, अशी सूचना जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आली.

संबंधित बातम्या

Back to top button