महायुती सरकार शेतकर्यांची फसवणूक करणारे
बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस

*खा.अमर काळे, आ.रोहित पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती
तिवसा /12 जून: शेतकरी व सामान्य जनतेची ताकद काय असते हे या सरकारला दाखवून देण्याची वेळ आली आहे. तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही शेतकर्यांसह जनतेला खोटी ओशासन दिली, महाविकास आघाडी सरकारने तीन लाखा पर्यंत शेतकर्यांचे कर्ज माफ करू असे म्हटले होते तर महायुती सरकारने त्याही पलीकडे जाऊन पूर्ण सातबारा कोरा करू असे ओशासन दिली मुख्यमंत्री, आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी थोडी तरी या लाज वाटू द्या शेतकर्यांना फसवून तुम्ही सत्तेत बसले आहात, सातबारा तर कोरा केला नाही परंतु महाराष्ट्र कोरा करायला निघाले आहे अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोझरी येथील अन्नत्याग आंदोलना दरम्यान महायुती सरकारवर केली.ते माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी छत्रपती संभाजीराजे, खासदार अमर काळे, रोहित पवार,सलील देशमुख, दीपकभाई केदार,हेमंत देशमुख, अनिल जलमकर, तेजस्विनी बारब्दे, अविनाश ठाकरे, तुषार देशमुख,संगीताताई ठाकरे, अमित अढावू, प्रवीण मोहोड,सुरेश काळे, प्रकाश पोकळे,दामू इंगोले, संजय आपकाजे,प्रफुल उमरकर, प्रशांत शिरभाते,स्वप्नील कोठे, दिनेश आमटे,पुरुषोत्तम देवतळे, निलेश नारखेडे, बल्लु जवंजाळ, संजय देशमुख,जितू दुधाने,महेश बडे, ध्यानेेशर खरात पाटील,विजय विल्हेकर उपस्थित होतें. माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली.यावेळी त्यांनी अजित पवार यांनी राज्याची स्तिथी चांगली नाही असे म्हटले होते.त्यामुळे निवडणूकीतील जाहीरनामा काढला तेव्हा आपण शुद्धीवर नव्हते का असा आरोप यावेळी राजू शेट्टी यांनी केला. राज्यातील शेतकरी, कष्टकरी यांच्या मागण्यासाठी आम्ही बच्चू कडू यांच्या सोबत आहोत, परंतु माज व घमंड या सरकारचा वाढल्याने यांना शेतकर्यांचे काही हीं देणे घेणे नाही, तुम्ही जर शेतकर्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असला तर आम्ही देखील रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी तयार आहोत.
-रोहित पवार,आमदा