विकसित भारत जनआकांक्षा बनली आहे

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मोदींची अर्थतज्ज्ञांसोबत बैठक

नवी दिल्ली /31 डिसेंबर : फेब्रुवारी 2026 मध्ये मांडल्या जाणार्‍या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरातील नामवंत अर्थतज्ज्ञांसोबत चर्चा केली. नीती आयोगामध्ये ही बैठक पार पडली. यावेळी ‘आत्मनिर्भरता आणि संरचनात्मक परिवर्तन: विकसित भारतासाठीचा अजेंडा’ या विषयावर चर्चा झाली. तसेच अर्थतज्ज्ञांनी आपली मते मांडली. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी, नीती आयोगाचे सीईओ बी.व्ही.आर. सुब्रमण्यम, आयोगाचे इतर सदस्य, अर्थशास्त्रज्ञ आणि क्षेत्रांतील तज्ञही उपस्थित आहेत.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी भारताच्या 2047 पर्यंतच्या प्रवासातील मुख्य स्तंभांवर प्रकाश टाकला. विकसित भारताला राष्ट्रीय आकांक्षा म्हणून संबोधताना, पंतप्रधानांनी नमूद केले की, 2047 पर्यंत विकसित भारताची संकल्पना केवळ सरकारी धोरणांपुरती मर्यादित न राहता, ती एक खरी जनआकांक्षा बनली आहे. हा बदल शिक्षण, उपभोग आणि जागतिक गतिशीलतेच्या विकसित होत असलेल्या पद्धतींमध्ये स्पष्टपणे दिसून येतो, ज्यामुळे वाढत्या महत्त्वाकांक्षी समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वर्धित संस्थात्मक क्षमता आणि सक्रिय पायाभूत सुविधा नियोजनाची आवश्यकता आहे. संवादादरम्यान, अर्थशास्त्रज्ञांनी उत्पादन आणि सेवा क्षेत्रांमध्ये उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढविण्यावर धोरणात्मक विचार मांडले. या चर्चेत वाढीव कौटुंबिक बचत, मजबूत पायाभूत सुविधा विकास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब याद्वारे संरचनात्मक परिवर्तनाला गती देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. यावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) आंतर-क्षेत्रीय उत्पादकतेसाठी एक सक्षम घटक म्हणून भूमिका आणि भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या सततच्या विस्तारावरही चर्चा केली.तज्ञांनी नमूद केले की, 2025 मधील आंतर-क्षेत्रीय सुधारणांची अभूतपूर्व लाट आणि पुढील वर्षात त्यांचे आणखी होणारे मजबुतीकरण, यामुळे भारत आपला पाया मजबूत करून नवीन संधी निर्माण करून जगातील सर्वात वेगाने वाढणार्‍या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून आपले मार्गक्रमण करत राहील. शंकर आचार्य, अशोक के. भट्टाचार्य, एन आर भानुमूर्ती, अमिता बत्रा, जनमेजया सिन्हा, अमित चंद्रा, रजनी सिन्हा, दिनेश कनाबर, बसंता प्रधान, मदन साबना, जोशीमा, उमाकांत दास, पिनाकी चक्रवर्ती, इंद्रनील सेन गुप्ता, समीरन चक्रवर्ती, अभिमान दास, राहुल बाजोरिया, मोनिका हलन आणि सिद्धार्थ सन्याल हे अर्थतज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button