कुर्हा परिसरात पावसाने झोडपले; शेतकर्यांचे नुकसान
कांदा, ज्वारी,तिळासह इतर पिकांचे नुकसान शेतकरी त्रस्त

कुर्हा /26 मे: गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून यामध्ये वारा,विजा, पाणी, वादळ यामुळे शेतकर्यांच्या शेता मधील कांदा, ज्वारी,तिळ इतर भाजीपाला पिकांचे बरेच नुकसान झाले आहे.
25 मे रोजी दुपारी व रात्री वादळ वार्यांसह विजेच्या कडकडाट पावसाने जोर धरल्याने कुर्हा परिसरातील शेतकरी हैराण झाले असून कांदा पावसाने भिजल्यामुळे सड जोरात सुरू आहे.तसेच तिळ, ज्वारी पिक हे शेतकर्यांच्या तोंडावर आलेले पीकांचे हि अतोनात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.तसेच शेतकर्यांच्या शेतीची मशागत सुध्दा या पावसामुळे राहीली असून पुढे पेरणी करिता कशी शेती तयार करावी याचा सुध्दा शेतकर्यांसमोर फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर्षी असाच जर पावसाने कहर केला तर शेतकर्यांच्या शेती पडीत राहिल काय? असा गंभीर प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.तसेच शेतकर्यांचे जे काही नुकसान झाले त्याचे त्वरित सर्व्हे करून त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी कुर्हा व परिसरातील शेतकर्यांची आहे.