नवसारी प्रभागात पाणी पुरवठा अनियमित महिला त्रस्त

अमरावती /28 मे: नवसारी प्रभाग क्र. 3 शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वैशाली आशिष विधाते यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र जिवन प्राधीकरण कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. त्यांना प्रभागातील समस्या सांगून नवोदय विद्यालयामागील नंदनवन कॉलनी, एकविरा कॉलनी, तेजस्विनी कॉलनी, विद्युत तांत्रिक कॉलनी, अग्रवाल लेआऊट, पोटे लेआऊट, येथे मागील तीन वर्षापासून पाणी पुरवठयाची निश्चित वेळ नाही. वाटेल त्यावेळी पाणी पुरवठा करण्यात येतो. रात्री 10-11 वाजता पाणी पुरवठा केल्या जातो त्यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे. तसेच होणारा पाणी पुरवठा अत्यल्प असून नळाला फोर्स नसतो. त्यामुळे महिलांची चांगलीच दमछाक होत आहे. नविन पाईपालाईन टाकतांना नविन कनेक्शन देण्यात आले. त्यावेळी ठेकेदाराने व संबंधित अधिकार्यांनी मानकानुसार काही ठिकाणी कॉक लावण्यात आले तर काही ठिकाणी कॉक लावण्यात आले नाही. तशी तक्रार वारंवार देण्यात येऊन सुध्दा त्यावर कोणतीच उपाय योजना आजपर्यंत करण्यात आली नाही.
अनियमित होणारा पाणीपुरवठा तसेच अत्यल्प पाणी पुरवठा याबाबत उपकार्यकारी अभियंता श्री. काटे साहेब तसेच शाखा अभियंता श्री. अविनाशे साहेब यांच्यासोबत चर्चा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. फक्त तोंडी आश्वासन देऊन पाणी पुरवठा नियमित करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यांच्या तांत्रिक अडचणीचे कारण सांगुन पाणी पुरवठा अनियमित होत आहे व अल्प होत आहे असे त्यांनी मान्य केले. त्यावर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन देण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या सौ. वैशाली विधाते, श्री. शंकरराव राऊत, श्री. विजयराव सोनार, श्री. हिमांशु जयस्वाल, श्री. अशोकराव गांजरे, श्री. मुकुंद इंगोले, श्री. शरद धुर्वे, सौ. वैशाली सोनोने, सौ. श्रध्दा भटकर, सौ. सिमा राऊत, सौ. छाया दिंडेकर, सौ. निलिमा गांजरे, सौ. अर्चना राऊत, श्री. किरण सावंत, सौ. सोनार, सौ. लता देशमुख, सौ. शुभांगी चरपे, श्री. विनोद कांबे, सौ. सुनिता कडू, श्री. आशिष मोहोड, सौ. निता कांबे, श्री. सुरज मडावी, सौ. शालिनी येते व परिसरातील नागरीक व शिवसैनिक उपस्थित होते.