पिपरी पूर्णा येथील अंगणवाडी झाली खाजगी नागरिकांची मतेदारी
ग्रामपंचायत प्रशासन व अंगणवाडी सेविकांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

-लहान चिमुकल्या मुलांच्या आरोग्याला धोका अधिकारी मात्र सुस्त
चांदूरबाजार /29 मे: तालुक्यातील येत असलेल्या पिपरी पूर्णा येथील खाजगी व्यति विष्णू कुरवाडे यांनी आपल्या घरांचे बांधकाम सुरू केले असून बांधकाम ला लागणारे सर्व साहित्य अंगणवाडी मध्ये टाकून धुळीच्या मध्ये चिमुकल्या मुलांचे आरोग्य धोक्यात टाकले आहे ही सर्वात मोठी घटना असून प्रशासकीय अधिकारी ,ग्रामपंचायत प्रशासन अंगणवाडी सेविकेचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे या मध्ये खासगी व्यक्तीच्या भीती चे सामान अंगणवाडी मध्ये टाकून बांधकाम करणे आवश्यक नसते. अंगणवाडी हे सार्वजनिक स्थान आहे, जिथे मुलांना आणि आई-वडिलांना मदत केली जाते. खासगी व्यक्तीच्या भीतीमुळे किंवा कोणत्याही गैरसमजातून बांधकाम करणे योग्य नाही. या ठिकाणी सर्व लोहा , गिट्टी रेती परिसरा बाहेर करण्यात कारवाई करावी अशी मागणी ग्राम वासी यांनी केली आहे
अंगणवाडीमध्ये मुलांची काळजी घेणे, पोषण आणि शिक्षण देणे हे आवश्यक आहे. या गोष्टी ची तक्रार गावातील नागरिक यांनी केली आहे मात्र अद्यापही कुठलेही कारवाई झाली नाही आहे मुलांचे आरोग्य धोक्यात जाणार तेव्हा प्रशासकीय अधिकारी व ग्रामपंचायत यांना जाग येणार का असा मोठा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे या गोष्टी ची तात्काळ दखल घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ यांनी केली आहे