पश्चिम व दक्षिण भारताला जोडणार्‍या रेल्वेला मुदतवाढ

गर्दीच्या काळात प्रवाशांना दिलासा

अकोला /9 जून: पश्चिम व दक्षिण भारताला जोडणार्‍या रेल्वे गाडीला मध्य रेल्वेने मुदतवाढ दिली. त्यामुळे गर्दीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, रेल्वेचे डिजिटल व्यवहार वाढले आहेत. 94.76 टक्के उत्पन्न रेल्वेला डिजिटल माध्यमातून प्राप्त झाले. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन गाडी क्रमांक 07062/07061 भावनगरहै दराबाद (साप्ताहिक) समर स्पेशल गाडीचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या डब्यांची रचना,वेळापत्रक, थांबे आणि मार्गामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गाडी क्रमांक 07062 भावनगर-हैदराबाद साप्ताहिक समर स्पेशल गाडी आता 29 जूनपर्यंत चालवण्यात येईल. गाडी क्रमांक 07061 हैदराबाद- भावनगर साप्ताहिक समर स्पेशल गाडी आता 27 जूनपर्यंत चालवण्यात येणार आहे. या गाडीला सिहोर, सोनगढ, धोला, बोटाद, सुरेंद्रनगर गेट, विरमगाम, साबरमती, वडोदरा, सुरत, उधना, नंदुरबार, अमळनेर, धरनगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत, पूर्णा जंक्शन, नांदेड, मुदखेड जंक्शन, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल आणि सिकंदराबाद येथे थांबा आहे.

संबंधित बातम्या

Back to top button