खरीप पूर्व नियोजन व विकसित तंत्रज्ञानद्वारे भरघोस पीक उत्पादनाची शास्वती
कृषी विज्ञान केंद्र घातखेड द्वारे शेतकर्यांना कपाशी लागवड प्रणाली तंत्रज्ञानावर मार्गदर्शन

अमरावती /9 जून: भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली कृषी विभाग महाराष्ट्र शासन, आत्मा, तसेच कृषी विज्ञान केंद्र घातखेड अमरावती 1 यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषी संकल्प अभियान 2025 अभियान राबविण्यात येत असून या अभियाना अंतर्गत तिवसा तालुका येथील गाव वर्हा व अनकवाडी येथील ग्रामपंचायत येथे कार्यक्रम पार पाडण्यात आला. वर्हा गावातील सरपंच नीलिमा ताई समरीत, पी.एन.कडू, कृषी विभाग, ग्रामपंचायत सदस्य, अनकवाडी येथील सरपंच सूरज धुमणखेडे, उपसरपंच ज्ञानेेशर साबळे श्री.शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथील प्राध्यापक पी.बी साबळे, आर.के.पाटील, व कृषी महाविद्यालय येथील सर्व विद्यार्थी, अंकुर सीड्स कंपनी चे प्रतिनिधी निखिल बद्रे, व उपस्थित सर्व मान्यवर यांच्या उपस्थिती मध्ये खरीप पूर्व नियोजन व विकसित तंत्रज्ञान तसेच होतकरू शेतकर्यांचे मनोगत व विशिष्ट कार्य व शेतकर्याचे प्रश्न नोंदविण्यात आले. सदर कार्यक्रमाला डॉ. पी. पी.अधिकारी प्रधान शास्त्रज्ञ राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन ब्युरो नागपूर तसेच कृषी विज्ञान केंद्र घातखेड चे डॉ. अतुल कळसकर वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, डॉ. अतुल फुसे विषय विशेषज्ञ उद्यान विद्या, पी.एन.मेंढे कृषी विद्या, आत्माचे कृषी सहायक अधिकारी, कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक अधिकारी, कृषी पर्यवेक्षक अधिकारी, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. उपस्थित शेतकर्यांना शास्त्रज्ञ व उपस्थित मान्यवर यांनी खरीप पूर्व नियोजन तसेच खरीप हंगामात घेणारी पिके नवीन पिके खर्च कमी जास्त उत्पादन, किड नियंत्रण व्यवस्थापन, पर्यावरण अनुकूल हवामान अंदाज, जमीन, माती, पाणी, योग्य वेळी योग्य नियोजन याचे सविस्तर माहिती मार्गदर्शन सर्व शेतकर्याना देण्यात आली. शेतकरी वर्गाचे प्रश्न काय? यावर चर्चा करण्यात आली शेतकर्यांनी आपले मनोगत व्यक्त केले असे अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावर उपाय योजना सरकारनी कराव्या असे मत शेतकर्यांनी व्यक्त केले. या कृषी संकल्प अभिनयान अंतर्गत एक शेतकर्यांना कृषी विज्ञान केंद्र मार्फत शास्त्र शुद्ध शेती नियोजन करण्यात आले सर्व शेतकरी यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. शेतकर्यांना याचा नक्कीच बदल, नवीन काही तरी करण्यास नक्कीच मदत होईल शेतकरी संपन्न होईल.