उत्पादनवाढीसाठी जलसंवर्धन गरजेचे

नागपूर /8 जून– कृषी उत्पादन वाढवायचे असेल तर जलसंवर्धन आवश्यक आहे. पाण्याची मुबलक राहिल्यास कृषी उत्पादनात वाढ होण्यासह शेतकर्यांच्या आत्महत्याही थांबतील, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जनकल्याणकारी समितीच्या संयुक्त वतीने वनामती सभागृहात विदर्भ पाणी परिषद आयोजित करण्यात आली आहे. दुसर्या दिवशी आयोजित कृषी जल परिषदेत केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी बोलत होते. यावेळी आ. डॉ. संजय कुंटे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे- चवरे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, वक्ते डॉ. विजय देशमुख, अधिसभा सदस्य शुभांगी आनंदराव राऊत उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, मागील काळात विदर्भातील 6 जिल्ह्यांत 10 हजारांपेक्षा जास्त शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सिंचनाचा अभाव तसेच कापसाला कमी उत्पादन मूल्य हे दोन प्रमुख मुद्दे शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत असल्याचे शेतकरी आत्महत्येचे अध्ययन करताना निदर्शनास आले. त्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी जलसंवर्धन आवश्यक आहे.मंत्री असताना मोठे, मध्यम अनेक सिंचन प्रकल्प निर्माण केले. पंतप्रधान सिंचन योजना, बळीराजा सिंचन योजनेच्या माध्यमातून 15 ते 16 हजार कोटी रुपयांची सिंचनाची कामे विदर्भात झाली. ग्रामीण भागाचा विकास शेतीवर अवलंबून आहे. जीडीपीत 12- 13 टक्के वाटा कृषी क्षेत्राचा आहे. कृषी क्षेत्रावर 60 ते 65 टक्के जनता अवलंबून आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती मागासलेली आहे. त्यामुळेच आत्महत्या होत असून त्याचा संबंध पाण्याशी आहे. त्यामुळेच पाण्याचे जतन आवश्यक आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले. विचारमंथन करून, वेळ पडल्यास आवश्यक संशोधन करून समाजातील समस्यांवर तोडगा काढण्यास विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले. पाणी वापर संस्थांच्या शेतकर्यांनी पाण्याचा वापर केल्यास जलसंवर्धन होईल, असा विेशास डॉ. विजय देशमुख यांनी व्यक्त केला. नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, म्हापसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, लिटूचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, नीरीचे संचालक डॉ. एस. कृषी सहसंचालक डॉ. उमेश घाटगे, राष्ट्रीय मृदा ब्यूरोचे संचालक डॉ. नितीन पाटील, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे उपसंचालक डॉ. चंद्रकांत भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, सिनेट सदस्य डॉ. विजय इलोरकर, शुभांगी नक्षिणे-उंबरकर, राज मदनकर, अजय चव्हाण, रासेयो संचालक डॉ. सोपानदेव जनकल्याणकारी समितीचे अध्यक्ष सुमंत पुणतांबेकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक जण परिषदेसाठी परिश्रम घेत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button