ठोस निर्णय घ्या, अन्यथा आमची अंत्ययात्रा काढा
बच्चू कडूंचा निर्वाणीचा इशारा

* मंत्री संजय राठोडांची विनंती धुडकावली
अमरावती /13 जून: शेतकर्यांच्या प्रश्नांवर गेल्या 8 जूनपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. उपोषणाच्या सहाव्या दिवशी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी गुरूकूंज मोझरी येथे उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी बच्चू कडू यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, पण ती धुडकावून कडू यांनी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. बच्चू कडू म्हणाले, संजय राठोड यांनी जी सहानुभूती दाखवली त्याचा मी आदर करतो. मात्र, शेतकरी, शेतमजुरांसोबत आम्ही विेशासघात करू शकत नाही. मागण्यांवर एकत्र निर्णय घ्या नाही तर आमची अंत्ययात्रा काढा, तशी व्यवस्था करा. या दोन्ही पैकी काही जरी केले तरी ते आम्हाल मान्य आहे. आम्ही कर्त्यव्यात कुठेही कसूर करणार नाही. रोज 15 ते 20 शेतकरी आत्महत्या करत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. यावेळी संजय राठोड म्हणाले, बच्चू कडू यांनी सहा दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आज त्यांची भेट घेत त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. आज त्यांना उलटी झाली. त्याची प्रकृतीची काळजी आम्हा सर्वाना आहे. महिन्यातील दर मंगळवारी कॅबिनेट बैठक होते. त्यामध्ये आपल्या मागण्यांचा विषय मी विशेष म्हणून मांडणार आहे. फडणवीस-अजित पवार शेतकर्यांना फसवताहेत-आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला. अनिल देशमुख यांनी शुक्रवारी गुरूकुंज मोझरी येथे पोहचून उपोषणकर्ते बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी देशमुख म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीसांनी कर्जमाफी, सातबाराबाबतचे दिलेले ओशासन पूर्ण करावे. याचा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे. फडणवीसांनीच ओशासन दिले असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्याची आवश्यकता नाही.बच्चू कडूंच्या उपोषणाच्या चौथ्या दिवशी महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडूंना फोन केला आणि म्हणाले की, जमत असेल तर उपोषण सोडा, नाही तर.. अशी भाषा बावनकुळे यांनी वापरली. बावनकुळे यांनी असे बोलणे योग्य नाही. त्यांची मंत्री म्हणून अशी भाषा वापरणे योग्य नसल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.