शहरातील अस्वच्छतेच्या मुद्यावर खा.वानखडे आक्रमक
अमरावती मनपा देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याचा संकल्प

*महापालिकेत विविध मुद्यांवर दीड तास आढावा बैठक
*अधिकारी, कंत्राटदार यांच्यासह अनेकांना घेतले धारेवर
*सर्वांमध्ये मिलिभगत असल्याचा आरोप
अमरावती /10 जून: खा.बलवंत वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार 10 जून रोजी अमरावती शहरातील कचरा, अस्वच्छता आणि प्रत्येक भागातील साचलेले घाणीचे साम्राज्य याबाबत आढावा बैठक विेशरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आली होती. खा. बलवंत वानखडे व माजी आमदार डॉ.सुनिल देशमुख यांनी महानगरपालिकेला भेट दिल्याबद्दल त्यांचा यावेळी महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत व सत्कार केला. यावेळी खासदार महोदयांनी अमरावती शहरातील कचरा, अस्वच्छता आणि प्रत्येक भागातील साचलेले घाणीचे साम्राज्य या विषयांवर सविस्तर चर्चा करुन संबंधीत विभागांना निर्देशित करण्यात आले. या बैठकीत पावसाळापुर्वीचे उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे याबाबत मोहीम हाती घ्यावी असे निर्देश खासदारांनी दिले. वार्डा-वार्डातील साफ सफाई, नाली व नाले सफाई, गटार साफ सफाई करण्याचे निर्देश यावेळी खासदारांनी दिले. सदर परिसरातील नाल्यांची साफ सफाई बाबत खासदार महोदयांनी आढावा घेतला. सदर परिसरातील नाल्या साफ सफाई करण्याची कार्यवाही करणे सुरु असून नाल्याची सफाई योग्य पध्दतीने करण्याचे निर्देश दिले. सदर परिसरातील निघणा-या कच-याचे नियोजन करुन सदर तांत्रीक पध्दतीने कच-याचे विल्हेवाट लावावी. नाल्यात असा कचरा फेकला असल्यास त्यावर प्रशासकीय कार्यवाही त्वरीत करावी. प्रत्येक अधिका-याने समन्वयाने काम करावे. कर्मचा-यांनी दिलेली जबाबदारी व्यवस्थीतरित्या पार पाडावी. जनतेचे कामे वेळोवेळी करुन त्यांना सहकार्य करावे. या बैठकीत अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर मिलींद चिमोटे, विलास इंगोले, अशोक डोंगरे, वंदना कंगाले, माजी नगरसेवक बाळासाहेब भुयार, प्रदिप हिवसे, मुन्ना राठोड, प्रमोद पांडे, रफीक पत्रकार, सलिम बेग, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, भैय्या साहेब पवार, अधिकारी, पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. गाडगे बाबांच्या समाधीसमोर कचर्याचे ढीगहोत नसल्याने धारेवर घेतले. खा.वानखडे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मनपातील कर्मचारी तब्बल बसल्याचे दिसून आले.
*गाडगे बाबांच्या समाधीसमोर कचर्याचे ढीग
महापालिकेतील आढावा बैठकीतील खा.बळवंत वानखडे यांनी शहरातील स्वच्छतेच्या ढासळलेल्या मुद्यावर उपस्थितांची कानउघाडणी केली. स्वच्छतेचा संदेश देणार्या संत गाडगेबाबा नगरातील गाडगे बाबांच्या समाधीसमोर कचर्याच्या ढिगार्याकडे लक्ष वेधले. अनेक दिवस कचर्याचे ढीग पडून असल्याने संबधीत अधिकार्यांची कानउघाडणी केली. तसेच ठेकेदारावर कारवाइ करावी.