खा.बळवंत वानखडे यांची मजीप्रा कार्यालयावर धडक
शहरात नियमित पाणीपुरवठ्यासाठी सूचना

*नागरिकांनीही उघडपणे मांडल्या समस्या
*सर्वाधिक आक्षेप वेळेच्या अनियमिततेवर
अमरावती /13 जून: खा.बळवंत वानखडे यांनी शहरात अनियमितपणे पाणीपुरवठा सारख्या मुद्दयांवर शुक्रवारी दुपारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली. अभियंता व अधिकार्यांना शहरात सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले. खासदारांच्या उपस्थितीत नागरिकांनीही अभियंत्यांसमोर उघडपणे आपल्या तक्रारी मांडल्या. अनेक भागात रात्री-बेरात्री पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीकडे अनेकांनी लक्ष वेधले. यावेळी माजी आ.डॉ.सुनील देशमुख, शहरप्रमुख बबलू शेखावत, विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, बाळासाहेब भुयार, भैया पवार, प्रमोद पांडे, विनोद मोदी आणि मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. खा.बळवंत वानखडे यांनी मजिप्रा अभियंत्यांना नागरिकांच्या वाढत्या समस्येवर धारेवर घेतले. नागरिकांना नियमित मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करावा व दुषीत पाणी मिळणार नाही याकडे लक्ष वेधले. यावेळी बैठकीला रामेेशर अभ्यंकर, विनोद मोदी, प्रमोद पांडे, भैयासाहेब निचत, अब्दुल रऊफ, सलीम मिरावले, सुजाता झाडे, देवयानी कुर्वे, वंदना थोरात, अनिला काझी, फिरोज खान, विजय वानखेडे, गजानन जाधव, अभिनंदन पेंढारी, सादिक शाह, अरुण जयस्वाल, सतीश मेटांगे, डॉ.मतीन अहेमद, डॉ. आबीद हुसेन, सुरेश गुप्ता, निलेश गुहे, वैभव देशमुख, नितीन काले, प्रा.बी.टी.अंभोरे, अजीम ठेकेदार, सत्तार भाई, अरुण बनारसे, विजय खंडारे, अमर देशकर, राजेश उपलकर, प्रकाश नगराळे, विजय राठोड, अतुल काळबेंडे, अज्जू ठेकेदार, कलीम शाह, हुसेन खान, मोहम्मद निजाम, अनिकेत क्षीरसागर, मयूर निंभोरकर, प्रथमेश गावंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कायकर्ते उपस्थित होते.