बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शेतकरी उतरले धरणात

अधिकारीही पोहचले आंदोलनस्थळी

वरुड । 12 जुन– गुरुकुंज मोझरी येथे माजी मंत्री बच्चु कडू यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफी सह इतर मागण्यांसाठी सुरु केलेल्या लेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देत झाटामझिरी येथील शेतकर्‍यांनी स्वयंस्फुर्तीने सभापती नरेंद्र पावडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून जलसमाधी आंदोलन केले. तहसिलदारांच्या ओशासनाने आंदोलन मागे घेण्यात आले असले तरी मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गुरुकुंज मोझरी येथे प्रहारचे संस्थापक तथा माजी मंत्री बच्चु कडू यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवित तालुक्यातील झटामझिरी येथील शेतकर्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पावडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून भेंमडी धरणात जलसमाधी आंदोलन केले. यावेळी शेतकर्‍यांची कर्ज माफी करुन सातबारा कोरा करा,  शेतमजुरांना अपघाती विमा लागु करा, अपंगाच्या मानधन वाढ करा, पेरणी ते कापणी पर्यंत शेतकर्‍यांचा शेतातील मजुरीचा खर्च एम.आर. ई.जी.एस.मधून करा, यासह इतर मागण्या करण्यात आल्या. यावेळी शासनावर सडकून टीका करण्यात आली. शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या शासना विरोधात शेतकर्‍यांच्या कर्ज माफिसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोझरी येथे अन्न त्याग आंदोलन केले. आज अन्न त्याग आंदोलनाचा पाचवा दिवस असून बच्चू कडू यांची प्रकृती खालावली असूनही अजूनपर्यंत शासनाने दखल घेतली नसल्याने आज गुरुवार झटामझिरी येथील शेतकर्‍यांनी धरणात उतरुन शासनाचा निषेध केला व माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्या त्वरीत पूर्ण कराव्या असे निवेदन आंदोलक शेतकर्‍यांनी तहसीलदारांना दिले. यावेळी नायब तहसिलदार एम.जे.सहारे, ठाणेदार अर्जुन ठोसरे उपस्थितहोते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसीलदार यांचे ओशासननंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असून जर मागण्या पूर्ण न झाल्यास या पुढे उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र उर्फ बबलु पावडे, बिरसामुंडा समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा.कमलनारायण उइके, सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हिराकांत उईके, अ‍ॅड.पवन वाढिवे, बाळु पाटील, प्रहार संघटनेचे प्रणव कडू, अजय चौधरी, प्रफुल गोहाड, अंकुश शेंडे, शकील शहा, गजानन सलामे, मंगेश युवनाते, सुरदास कुमरे, नेमशाह वाडीवे, संकेत शेंडे, श्रीकांत उईके, यशवंती धुर्वे , आरती खातकर, कुंती पटीले, जयमाला नामले, दिपा खातकर, कल्याणी खातकर, कला खातकर, गायत्री खातकर, गिता मालवे, मिरा शिवणकर, सविता पटिले, निर्मला कुंभरे, बबली पटीले, शारदा इडपाची, प्रविणा मंडाणी, किर्ती नररे, ऋतवी उईके, देवराव धुर्वे, मनिषा उईके, अर्जुन उईके, प्रदीप तिडगाम, माणिक धुर्वे , साहेबराव वाडिवे, माधव अहाके, गणपतराव धुर्वे , सुरेश परतेती, गजानन सलामे, संदीप कुसराम, नामदेव चरखेडे, माणिक धुर्वे , शिवमधुर्वे , विशाल उईके, शुभम सलामे, सुधाकर धुर्वे , प्रदीप आहाके, आनंद वाडिवे, दशरथ भलावी, प्रभाकर आहाके, शेषराव युवनाते, बिहारी पाटील, रामराव उईके, ज्ञानेश्वर सिरसाम, दिनेश नवडेक, जगदेव सलामे, माधव सलामे यांचेसह शेकडो शेतकरी, शेतमजूर, महिला, पुरुष सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

Back to top button