राज्याच्या विकासासाठी आम्ही कटीबध्द

मुंबई– महाराष्ट्रातील भाज पच्या विजया बद्दल पंत प्रधान मोदी म्हणाले – महाराष्ट्र विका साच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजप आणि महायुतीला आशीर्वाद दिल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा आभारी आहे. हे लोककेंद्रित विकासाच्या आमच्या दृष्टिकोनावरील विश्वासाचे प्रतिबिंब आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नवीन उर्जेने काम करण्यास वचनबद्ध आहोत. तळागाळातील भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमाबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.




