मुंबईतील रेल्वे दुर्घटनेतून देशाचं वास्तव दिसून येत

मुंब्रा अपघातानंतर राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

नवी दिल्ली/9 जून: मध्य रेल्वेवरील दिवा आणि मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 13 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर शासनाकडून मृतांच्या वारसांना मदत जाहीर करण्यात आली आहे. पण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंब्रा अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. सरकारने 2025 बद्दल बोलणे थांबवले असून आतापासूनच 2047 ची स्वप्ने विकत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करताना म्हटले की, मोदी सरकार 11 वर्षे सेवेत राहिल्याबद्दल साजरे करत आहे, पण मुंबईहून आलेल्या दुःखद बातमीतून देशाचे वास्तव दिसून येते. ट्रेनमधून पडून अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. खरं तर भारतीय रेल्वे लाखो लोकांच्या जीवनाचा कणा आहे, परंतु आज तीच रेल्वे असुरक्षितता, गर्दी आणि अराजकतेचे प्रतीक बनली आहे. मोदी सरकारची 11 वर्षांत कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही, कोणताही बदल केलेला नाही, फक्त प्रचार करत आहे. कारण सरकारने 2025 बद्दल (फूट बॉर्डवर) लटकून प्रवास करीत होता. अनेक प्रवासी अशाच तर्‍हेने दरवाज्यात लटकून प्रवास करीत होते. प्रवाशांच्या पाठीवरील बॅगा विरुद्ध दिशेने येणार्‍या पुष्पक एक्स्प्रेसला घासून गेल्यामुळे ते खाली पडले. मुंब्रा ते दिवा या रेल्वे स्थानक दरम्यान ही दुर्देवी घटना घडली. या अपघातात अनेक प्रवाशांनी आपले प्राण गमावले. त्यात पोलीस विकी मुख्यदलचा देखील समावेश आहे.

संबंधित बातम्या

Back to top button