संचार साथी अॅप प्री-इन्स्टॉल करण्याची सक्ती मागे
जबरदस्त विरोधामुळे सरकारची नामुष्की

* मोबाईल कंपन्यांना मोठा दिलासा
नवी दिल्ली /3 डिसेंबर : मोबाईलमध्ये संचार साथी ऍप प्री इन्स्टॉल करण्याचा निर्णय सरकारनं मागे घेतला आहे. मोबाईलमध्ये संचार साथी ऍप प्री एन्स्टॉल करणं अनिवार्य नसेल, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दोन दिवस वादंग माजल्यानंतर अखेर सरकारनं यू टर्न घेतला आहे. यामुळे मोबाईल निर्मात्या कंप न्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सायबर गुन्हे, चोरी या सारख्या प्रका रांना आळा
घालण्यासाठी
मोबाईल कंपन्यांनी संचार साथी ऍप प्री इन्स्टॉल करावं. हे ऍप डिलिट किंवा डिसेबल करता येणार नाही, याची काळजी घ्यावी, असा आदेश सरकारनं काढला होता. कंपन्यांनी विकलेल्या मोबाईलमध्ये म्हणजेच आताच्या घडीला वापरात असलेल्या मोबाईलमध्ये हे ऍप अपडेटच्या माध्यमातून इन्स्टॉल करावं, असा आदेश सरकारनं काढला होता. पण आज या प्रकरणात दूरसंचार विभागानं स्पष्टीकरण दिलं आहे. संचार साथी ऍप आधीपासूनच इन्स्टॉल करण्याची अनिवार्यता सरकारनं संपुष्टात आणली आहे. त्यामुळे मोबाईल निर्मात्या कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.दूरसंचार मंत्रालयानं संचार साथी ऍपबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. ’सगळ्या नागरिकांना सायबर सुरक्षा देण्याच्या हेतूनं सरकारनं सगळ्या स्मार्टफोनमध्ये संचार साथी ऍपचं प्री इन्स्टॉलेशन गरजेचं केलं होतं. हे ऍप पूर्णपणे सुरक्षित आहे. सायबर विश्वातील वाईट लोकांपासून, गुन्हेगारांपासून लोकांचं संरक्षण करण्यास ते ऍप सक्षम आहे. संचार साथीची वाढती लोकप्रियता पाहता सरकारनं मोबाई कंपन्यांसाठी या ऍपचं प्री-इन्स्टॉलेशन अनिवार्य न करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असं दूरसंचार मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.’संचार साथी ऍप सगळ्या नागरिकांना चुकीच्या व्यक्तींपासून दूर ठेवतं. वापरकर्त्यांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवतं. याशिवाय हे ऍप अन्य काहीच करत नाही. वापरकर्ते हे ऍप हवं तेव्हा त्यांच्या मोबाईलमधून डिलीट करु शकतात,’ अशी माहिती मंत्रालयानं दिली. आतापर्यंत 1.4 कोटी लोकांनी संचार साथी डाऊनलोड केलं असून यामुळे दररोज सरासरी 2000 फसवणुकीच्या घटना टळत आहेत, अशी आकडेवारी सरकारकडून देण्यात आली आहे.




