केंद्रीय मंत्रीमंडळातील 60 टक्के मंत्री डउ, डढ, जइउ मधील
मोदी सरकारची 11 वर्षे सुवर्णकाळ; देशाला प्रत्येक क्षेत्रात नंबर 1 बनविण्याचे लक्ष्य

नवी दिल्ली/9 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता स्विकारून आता 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त मोदींनी ट्विटमधून विविध गोष्टींची माहिती दिली आहे. त्यांनी शेअर केलेल्या लिंकमधून त्यांनी सध्याच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील 60 टक्के मंत्री हे डउ, डढ, जइउ प्रवर्गातून आल्याचे म्हटले आहे. हे देशाच्या इतिहासात मंत्रिमंडळात या वंचित गटांचे सर्वाधिक प्रतिनिधित्व असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. काँग्रेससारख्या विरोधी पक्षांकडून सरकारवर या घटकांच्या हिताविरुद्ध काम करत असल्याचा आरोपावर मोदींनी ही माहिती दिली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देखील ट्विटमध्ये मोदी सरकारची 11 वर्षे हा सुवर्णकाळ असल्याचे म्हटले आहे. देशाला प्रत्येक क्षेत्रात नंबर वन करण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. एक्स (द) वरील पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की, 11 वर्षांच्या कार्यकाळात भारताने केवळ जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळवले नाही, तर हवामान बदल आणि डिजिटल नवोपक्रम यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवरही महत्वाची कामगिरी केल्याचे म्हटले आहे. गुड गव्हर्नन्स आणि परिवर्तन यावर स्पष्ट लक्ष केंद्रित केले आहे. 140 कोटी भारतीयांच्या आशीर्वादाने आणि सामूहिक सहभागाने भारताने विविध क्षेत्रांत वेगवान परिवर्तन अनुभवले आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विेशास, सबका प्रयास या तत्त्वावर मार्गक्रमण करत एनडीए सरकारने वेग, प्रमाण आणि संवेदनशीलतेसह क्रांतिकारी बदल केले असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक प्रगतीपासून सामाजिक उत्थानापर्यंत, लोककेंद्रित आणि सर्वांगीण प्रगतीवर लक्ष केंद्रित केल्याचे ते म्हणाले.
11 वर्षे सेवा हॅशटॅग
पंतप्रधान म्हणाले, आपल्या सामूहिक यशाचा आम्हाला अभिमान आहे, पण त्याच वेळी आपण आशा, आत्मविेशास आणि विकसित भारत घडवण्याच्या नव्या निर्धाराने पुढे पाहतो आहोत. त्यांनी 11 वर्षे सेवा हा हॅशटॅग वापरत वेगवेगळ्या क्षेत्रांत घडवलेल्या बदलांची माहिती देणारे दुवे शेअर केले.