आसाममध्ये महापुरामुळे 23 मृत्य

12 जिल्ह्यांमध्ये 3.37 लाख नागरीकांना पुराचा फटका

काझीरंगा नॅशनल पार्क व पोबितोरा वन्यजीव अभयारण्य पाण्याखाली

गुवाहाटी /8 जून: आसाममधील पूरस्थितीत थोडी सुधारणा झाली असली तरी राज्यातील 12 जिल्ह्यांमधील सुमारे 3.37 लाख नागरिक अजूनही पुराच्या तडाख्यात आहेत, अशी माहिती अधिकार्‍यांनी रविवारी दिली. सरकारी बुलेटिननुसार, आतापर्यंत पुर आणि भूस्खलनामुळे एकूण 23 जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये 6 जण भूस्खलनात मरण पावले आहेत. श्रीभूमी हा आसाममधील सर्वाधिक पूरप्रभावित भाग असून, 1.93 लाखांहून अधिक लोक तिथे पुराच्या विळख्यात आहेत. इतर प्रभावित जिल्ह्यांमध्ये हैलाकांडी येथील 73724 तर कछार येथील 56398 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.

पूराची सध्याची स्थिती

एकूण 337358 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. 41 सर्कल व 999 गावे प्रभावित झाली आहेत. 36000 हून अधिक नागरिकांनी 133 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. 68 मदत वितरण केंद्रांतून गरजूंना मदत पोहचवली जात आहे. पुरामुळे 12659 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. 2 जिल्ह्यांमध्ये शहरी पूरामुळे 284 लोक प्रभावित काझीरंगा नॅशनल पार्क व पोबितोरा वन्यजीव अभयारण्य अजूनही पाण्याखाली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button