ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये सुद्धा गुणवत्ता

शाहीर भिमराव पांचाळे यांचे प्रतिपादन

चांदूरबाजार /26 मे: ग्रामीण विद्यार्थ्यात गुणवत्ता आहे.त्यांना वेळो वेळी स्पर्धा परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन व अभ्यासाची आवश्यक साधने मिळाली तर ते आपली गुणवत्ता स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सिध्द करु शकतात असे महत्वपुर्ण प्रतिपादन लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त मराठी शाहीर भिमराव पांचाळे यांनी केले.
गाणसम्राज्ञी लला मंगेशकर शब्द पुरस्कार प्राप्त भिमराव दादा पांचाळे आपल्या गृह तालुक्यात आले असता त्यांनी चांदूरबाजार येथील राष्टनिर्माण स्पर्धा परिक्षा केंद्र येथे सदिच्छा भेट दिली. त्यावेळी परीक्षा केंद्रातर्फे निलेश फुटाणे व रवि संगेकर यांनी त्यांचा सत्कार केला. तालुक्यातील राष्ट्र निर्माण प्रशासकीय अकादमी चांदूरबाजार गेल्या पंधरा वर्षापासून प्रा. गजानन कोरे याच्या मार्गदर्शनात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन करण्यात येत आहे, अमोल म्हस्के, निलेश फुराणे, मयुर सवळे याच्या अथक परिशमातुन तालुका व परिसरातील 210 विद्यार्थी शासनाच्या विविध पदावर कार्यरत झाले आहे.येथे गोर गरीव विदयार्थी यांना निशुल्क स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन करण्यात येते.येथील स्पर्धा परीक्षेच्या ग्रंथालयात पालीका विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक व्हि, के खांडे व त्पांचे सुपुत्र उपविभागीय अधिकारी अनुपकुमार खांडे यांनी दान दिलेल्या पुस्तकांचा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना उपयोग होतो. या सेवा कार्याचे पांचाळे यांच्या कडून कौतुक करण्यात आले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व स्पर्धा परिक्षा सोयी सुविधा दिल्या तर ते सुद्धा गुणवत्ता सिद्ध करू शकतात अशी अपेक्षा पांचाळे यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या यशस्वी करीता प्रेम अंबुलकर, प्रितम इंगळे यानी परश्रम घेतले. यावेळी स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button