पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त

30 मे ला भाजपा जिल्हा ग्रामिण तर्फे भव्य वक्तृत्व स्पर्धा

अमरावती /28 मे: पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून 30 मे रोजी शुक्रवारी दुपारी 3 वाजता अभियंता भवन शेगाव नाका अमरावती येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन 11 वी ते पदव्युत्तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली असून स्पर्धेचे विषय राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भारताचे स्वत्व जिवंत ठेवणारी शासक, कल्याणकारी शासक अहिल्यादेवी होळकर, अहिल्यादेवी होळकर महिला सशक्तीकरणाच्या प्रतीक असून प्रथम बक्षीस 5 हजार रुपये रोख,दुसरे बक्षीस 3 हजार रुपये रोख,तिसरे बक्षीस 2 हजार रुपये तर प्रोत्साहनपर बक्षीस 1 हजार रुपये रोख देण्यात येणार असून प्रवेश शुल्क 50 रु आकारण्यात आला आहे. प्रथम 30 येणार्‍या स्पर्धकांना प्राथमिकता असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी तसेच माहिती व नाव नोंदणी करण्याकरिता वक्तृत्व स्पर्धेचे संयोजक सुखदेव पवार मो 96574 81896 सह संयोजक दिनकर सुंदरकर 9970294101सौं साधनाताई म्हस्के 7038749572 यांच्या संपर्क साधण्याचे आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button