नागरिक अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधेपासून वंचित

वडाळी प्रभाग क्र 9 अंतर्गत निलकंठ लेआऊट मधील

अमरावती /5 जून: निळकंठ लेआउट महादेवखोरी परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. बुधवार दि. 4 जून 2025 रोजी परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते नागेश लोणारे यांना आमंत्रित केले यावेळी सुमेध इंगळे चंद्रशेखर वानखडे, ऋषिकेश चवरे यांच्याकडे आपल्या परीसरातील व्यथा मांडल्या.
या भेटी दरम्यान नागरिकांनी अनेक गंभीर समस्या मांडल्या. परिसरात पक्क्या रस्त्यांचा अभाव असून, नाल्यांची व्यवस्था नाही, सार्वजनिक स्वच्छता साधनांची कमतरता आहे, आणि कचर्‍याची गाडीही नियमित येत नाही. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या तसेच दैनंदिन जीवनाच्या बाबतीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांबाबत निळकंठ लेआउट व महादेवखोरी परिसर येथील नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे निवेदने सादर केली आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने, नागरिकांच्या समस्या अधिक तीव्र होत चालल्या आहेत.
नागेश लोणारे यांच्याकडे नागरिकांनी मांडलेल्या सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि त्या तातडीने संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवून आवश्यक कार्यवाहीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, गोरगरीब नागरिकांच्या मुलभूत हक्कांपासून कोणीही वंचित राहू नये. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून यावर उपाययोजना करावी. अन्यथा जनआंदोलन उभारण्याची वेळ येईल. यावेळी दिनेश चव्हाण,गजानन बोरकर, वैभव देशमुख, शोभा चव्हाण, संगीता मुरादे, किरण बोरकर, धनश्री घुरडे, सिंधू चव्हाण, अर्चना आडे, आरती नागदेवते, पुष्पा देशमुख, प्रमोद बोरकर, अंबादास नांदुरकर, दर्शन बोरकर, शितल राठोड, वैभव देशमुख, रमेश सिंग राठोड,रामेश्वर आडे, मनोहर चव्हाण, अतुल नागदेवते, हिरालाल जाधव, मुकुंद नांदुरकर हे परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते आणि त्यांनी सामाजिक कार्यकर्ता नागेश लोणारे यांच्याकडे न्यायाची मागणी केली.

संबंधित बातम्या

Back to top button