कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शेतीत नवे युग

डॉ. भूषण गोसावी यांचे प्रतिपादन

टाकरखेडा संभू /1 जून : कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial Intelligence) हे तंत्रज्ञान शेतीच्या रूपांतरासाठी एक क्रांतिकारी साधन ठरत आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन, दर्जेदार आणि टिकाऊ शेती शक्य असून हे भारतातील लघु शेतकर्‍यांसाठी वरदान ठरू शकते, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते डॉ. भूषण गोसावी यांनी शेतकरी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले.
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकर्‍यांपुढे वाढत्या खर्चामुळे आणि घटत्या उत्पादनामुळे निर्माण झालेल्या संकटामध्ये, गावकरी येथील श्री विजयराव बिजवे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर करत संत्रा पिकामध्ये आश्चर्यकारक सुधारणा साधली आहे. खराब झाडे काढून टाकून, सॅटेलाईट, रडार आणि ‘वेळ’ (डेटा-टाइम अ‍ॅनालिसिस) या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी पिकाचे पुनरुज्जीवन केले. डॉ. भूषण गोसावी यांनी सांगितले की, -ख च्या साहाय्याने हवामान बदल, रोग व कीड याचे अचूक निरीक्षण आणि पूर्वानुमान शक्य होते. त्यामुळे उत्पादनात वाढ तर होतेच, शिवाय अन्नही अधिक सुरक्षित आणि विषमुक्त राहते.
या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान मा. केशवराव मेटकर (उपाध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती) यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. राजेश शिरोळे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमामध्ये शेतकर्‍यांसाठी आयोजित डेमो संत्रादरम्यान गौरव बिजवे यांनी प्रत्यक्ष शेतातील तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हे सविस्तर दाखवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत देशमुख, संचालक, अमरावती नॅचरल यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, -ख चा वापर करून विषमुक्त, आरोग्यवर्धक अन्न पिकवणे शक्य आहे. हे केवळ शेतकर्‍यांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी आरोग्यदायी ठरेल.सूत्रसंचालन डॉ. वृषाली देशमुख (जे.डी. पाटील सांगळतकर महाविद्यालय) यांनी प्रभावीपणे पार पाडले. या कार्यशाळेमध्ये मॅप मायक्रो प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना शिक्षण, तंत्रज्ञान व शेती यांचा समन्वय साधत आधुनिक शेती पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांचे विचारही प्रभावीपणे मांडण्यात आले.

संबंधित बातम्या

Back to top button